शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

‘तेल्या’ने डाळिंब उत्पादक हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST

पाटणे : मालेगाव तालुक्यातील पाटणे परिसरात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या काही ...

पाटणे : मालेगाव तालुक्यातील पाटणे परिसरात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून तेल्या रोगाने थैमान घातल्याने डाळिंब लागवड क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महागड्या रासायनिक औषधांची वारंवार फवारणी करणे आर्थिक भांडवलाअभावी शेतकरी बांधवांना आता अशक्य झाले आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची नितांत गरज असून मदत मिळाली तरच डाळिंब बागा जिवंत राहतील.

निसर्गाचा लहरीपणा, रोगट हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. यावर्षी मात्र खरिपाच्या पेरणीसाठी पावसाने ओढ दिल्याने पेरणी झालेल्या काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. मागच्या वर्षी अवकाळी पावसामुळे डाळिंब व मका पिकांचे नुकसान झाले. त्याचीही नुकसान भरपाई काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तसेच पंतप्रधान पीक योजनेनुसार शेतकरी बांधवांनी डाळिंब व मका पिकांचा विमा उतरविला होता. अद्याप शेतकरी बांधवांना विमा कंपनीकडून पीक विमा भरपाई मिळालेली नाही. मागील वर्षाची पीक विमा रक्कम तत्काळ मिळण्याची मागणी जीवन आहिरे, चेअरमन पाटणे विविध कार्यकारी सहकारी संस्था पाटणे, संचालक वसंतराव आहिरे, रत्नाकर निकम, विलास खैरनार, नितीन पगारे, प्रदीप शेवाळे यांनी केली आहे.

------------------

शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

यावर्षी वरुणराजाच्या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाला बसत आहे. पावसामुळे जणूकाही खरीप हंगामच धोक्यात आला आहे. पावसाची मृग व आर्द्रा ही महत्त्वाची नक्षत्रे कोरडीच गेली. काही ठिकाणी खरीप पिकाची पेरणीही पूर्ण झालेली नाही. ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली आहे तेही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळ कांद्याचीही अवस्था वाईटच आहे. कांदा काढणीच्या वेळी बिगर मोसमी पावसामुळे कांदा खराब झाला. चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांसमोर कांदा विक्री शिवाय पर्याय उरला नाही. शिवाय कांद्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत चालल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.