शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

‘तेल्या’ने डाळिंब उत्पादक हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST

पाटणे : मालेगाव तालुक्यातील पाटणे परिसरात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या काही ...

पाटणे : मालेगाव तालुक्यातील पाटणे परिसरात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून तेल्या रोगाने थैमान घातल्याने डाळिंब लागवड क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महागड्या रासायनिक औषधांची वारंवार फवारणी करणे आर्थिक भांडवलाअभावी शेतकरी बांधवांना आता अशक्य झाले आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची नितांत गरज असून मदत मिळाली तरच डाळिंब बागा जिवंत राहतील.

निसर्गाचा लहरीपणा, रोगट हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. यावर्षी मात्र खरिपाच्या पेरणीसाठी पावसाने ओढ दिल्याने पेरणी झालेल्या काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. मागच्या वर्षी अवकाळी पावसामुळे डाळिंब व मका पिकांचे नुकसान झाले. त्याचीही नुकसान भरपाई काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तसेच पंतप्रधान पीक योजनेनुसार शेतकरी बांधवांनी डाळिंब व मका पिकांचा विमा उतरविला होता. अद्याप शेतकरी बांधवांना विमा कंपनीकडून पीक विमा भरपाई मिळालेली नाही. मागील वर्षाची पीक विमा रक्कम तत्काळ मिळण्याची मागणी जीवन आहिरे, चेअरमन पाटणे विविध कार्यकारी सहकारी संस्था पाटणे, संचालक वसंतराव आहिरे, रत्नाकर निकम, विलास खैरनार, नितीन पगारे, प्रदीप शेवाळे यांनी केली आहे.

------------------

शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

यावर्षी वरुणराजाच्या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाला बसत आहे. पावसामुळे जणूकाही खरीप हंगामच धोक्यात आला आहे. पावसाची मृग व आर्द्रा ही महत्त्वाची नक्षत्रे कोरडीच गेली. काही ठिकाणी खरीप पिकाची पेरणीही पूर्ण झालेली नाही. ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली आहे तेही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळ कांद्याचीही अवस्था वाईटच आहे. कांदा काढणीच्या वेळी बिगर मोसमी पावसामुळे कांदा खराब झाला. चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांसमोर कांदा विक्री शिवाय पर्याय उरला नाही. शिवाय कांद्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत चालल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.