शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आयमा निवडणुकीसाठी २९ रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:21 IST

अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या गुरुवार (दि. १७) पासून उमेदवारी अर्ज विक्री करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सिडको : अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या गुरुवार (दि. १७) पासून उमेदवारी अर्ज विक्री करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, सत्ताधारी एकता पॅनलच्या वतीने उद्योजक वरुण तलवार यांना अध्यक्षपदाचे उमेदवार आधीच घोषित करण्यात आले असून, इतर पदांसाठीचे उमेदवारदेखील लवकरच घोषित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.  आयमा पदाधिकाºयांचा कार्यकाळ मे महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येत असून, आयमाच्या २०१८-२० या कालावधीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १७ तारखेपासून निवडणुकीस प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, त्यादृष्टीने सत्ताधारी एकता पॅनल व दुसºया गटाच्या उमेदवारांकडून हालचालींना वेग आला आहे. सदरची निवडणूक ही मागील निवडणुकीप्रमाणेच बिनविरोध करण्यासाठी आयमाच्या माजी पदाधिकाºयांकडून प्रयत्न केले जात आहेत; परंतु सत्ताधारी व दुसरा गट यांच्यात जर समझोता झाला नाही तर एकता पॅनलच्या दुसºया गटाकडून अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसºया गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार उद्योजक तुषार चव्हाण हे राहणार असून, यामुळे समझोता न झाल्यास अध्यक्षपदासाठी का होईना ही निवडणूक होईल, अशी चर्चा आहे. सत्ताधारी एकता पॅनलने अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून वरुण तलवार यांचे नाव आधीच जाहीर केल्याने दुसºया गटाने यास आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. यावर या दोन्ही गटांत समझोता करण्यासाठी माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत; परंतु अद्यापही समझोता झाला नसल्याचे समजते. आयमाची २०१८-२० या कालावधीसाठी येत्या २९ मे रोजी निवडणूक घेण्यात येणार असून, ३१ मे राजी नवीन अध्यक्ष पदभार स्वीकारणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी जाहीर केले आहे.समझोता नाहीसत्ताधारी एकता पॅनलने वरुण तलवार यांना अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले असल्याने दुसºया गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण व त्यांच्या गटाने नाराजी व्यक्त केली आहे. मागील निवडणुकीत अध्यक्षपदाचा शब्द दिला असतानाही पुन्हा डावलण्यात येत असल्याचा आरोप तुषार चव्हाण गटाकडून करण्यात येत असून, सत्ताधारी एकता गटाकडून मागील दोन वर्षांत संघटनेच्या कोणत्याही बैठका, तसेच इतर कामांसाठी कोणतेही योगदान दिलेले नसल्याने तुषार चव्हाण यांना अध्यक्षपद मागण्याचा अधिकार नसल्याची चर्चा आहे. यामुळे दोन्ही गटांत समझोता न झाल्यास अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक