शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

४२२७ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:13 IST

नाशिक : जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होत असून, या निवडणुकीत ४२२७ जागांसाठी ११,०५४ उमेदवार नशीब ...

नाशिक : जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होत असून, या निवडणुकीत ४२२७ जागांसाठी ११,०५४ उमेदवार नशीब अजमावत आहेत. जिल्ह्यातील १ हजार ९५२ मतदान केंद्रांवर मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान प्रक्रियेप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

डिसेंबरअखेर मुदत संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ५५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उमराणे येथील निवडणूक रद्द करण्यात आली. त्यामुळे उर्वरित ५६५ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. १२ लाख ८४ हजार १०९ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यात ४४ ग्रामपंचायती या संवेदनशील असून, अतिसंवेदनशील ग्रामपंचायतींची संख्या ८ आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचे वाटप करून त्यांना आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले आहे. वाहनांमधून कर्मचारी आणि मतदानाचे साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचविण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत, तर १६२२ जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उर्वरित जागांसाठी शुक्रवारी मतदारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.