शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१५ जानेवारीला कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:18 IST

कळवण : तालुक्यातील अभोणा, कनाशी, पाळे बु., सप्तश्रृंगगड, ओतूर यांच्यासह कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी गटातटात, भाऊबंदकीच्या संशयकल्लोळात निवडणूक होणार आहे.

ठळक मुद्देअभोणा, कनाशी, पाळे बु., सप्तश्रृंगगड, ओतूर येथील रणांगणात चुरस

कळवण : तालुक्यातील अभोणा, कनाशी, पाळे बु., सप्तश्रृंगगड, ओतूर यांच्यासह कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी गटातटात, भाऊबंदकीच्या संशयकल्लोळात निवडणूक होणार आहे.या पार्श्वभूमीवर गावाचा विकास करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये यासाठी गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर ज्येष्ठ मंडळी प्रयत्नशील आहेत. युवावर्गात मात्र निवडणूक लढविण्यासाठी बळ दिले जाणार असून, गावागावांत आता गटातटाचे राजकारण होणार आहे.कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यामुळे ग्रामीण व आदिवासी भागात निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.कळवण तालुक्यातील अभोणा, कनाशी, ओतूर, पाळे बु., सप्तश्रृंगगड, नांदुरी, मेहदर, नरूळ, भुसणी, मुळाणेवणी, बापखेडा, तताणी, मोहनदरी, भगुर्डी, पळसदर, मोहमुख, ओझर, लिंगामे, वीरशेत, वडाळे(हा), बोरदैवत, जामलेवणी, कळमथे, सावकीपाळे, बिलवाडी, देवळीवणी, कुंडाणे(क), काठरे, गोसराणे या महत्त्वपूर्ण गावांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.नामनिर्देशन पत्र ३० डिसेंबरपर्यंत दाखल करता येणार आहे. १५ जानेवारीला मतदान -कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायती निवडणुकांसाठी नामनिर्देशन दि. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत दाखल करता येणार आहे. शासकीय सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तर मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल.२५ सप्टेंबरच्या मतदार याद्या ग्राह्य धरणार-विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत,

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक