शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय अनास्थेने झाली वाताहत

By admin | Updated: March 2, 2015 00:05 IST

परिवहन महामंडळ : नव्या मंत्रिमंडळाकडून सकारात्मक धोरणाची अपेक्षा

संकेत शुक्ल ल्ल नाशिकराज्यात दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आणि मध्यमवर्गीयांची लाइफलाइन असलेल्या परिवहन महामंडळाच्या तोट्यात दिवसागणिक होत असलेली वाढ ही गरजू प्रवाशांच्या मुळावर उठू शकते. विद्यार्थी, कामगारवर्ग, अपंग, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आवश्यक असलेली ही सेवा कायम टिकावी यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न गरजेचे असले तरी महामंडळाच्या या दुर्दशेस शासनच जबाबदार असल्याचे बोलले जाते आहे. महामंडळाचा तोटा वाढण्यासाठी जी काही कारणे आहेत त्यापैकी सरासरी एव्हरेज घसरलेल्या बसेस जशा तोटा वाढण्यासाठी कारणीभूत आहेत तस्ोच विविध प्रकारचे कर आणि टोल यामुळेही महामंडळाच्या उत्पन्नाला कात्री लागली. राज्य शासन सर्वच प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर आकारत असलेल्या कराची टक्केवारी पाहिली तर राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या महामंडळाच्या बसला सर्वाधिक कर आकारणी केली जाते. दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बससेवेला त्यामुळे करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.राज्यात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या टोलमध्ये महामंडळाच्या बसेसला टोलमाफीसाठी प्रयत्न केले जाणे गरजेचे होते, परंतु प्रारंभी त्याकडे लक्षच न दिल्याने महामंडळाच्या टोलचा भारही प्रवाशांवर पडला. त्यामुळे आता नव्या टोलमधून महामंडळाला माफी द्यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. परिवहन महामंडळ सर्वसामान्य नागरिकांची वाहतूक करते आणि त्याद्वारे दररोज लाखो प्रवाशांना सवलतीत प्रवास करण्याची मुभा दिली जाते. त्यात अपंग, विद्यार्थी आणि तत्सम वर्गातील नागरिकांचा समावेश होतो. त्या सेवेतून महामंडळाला होणारा तोटा शासनाकडून अनुदानाच्या रूपात दिला जातो. त्या रकमेचे शेकडो कोटी रुपये येणे बाकी आहेत. या सर्व बाबींचा शासनाने फेरविचार केला आणि त्यातून महामंडळाच्या बसेसला थोडे जरी वगळले तरी महामंडळाच्या उत्पन्नाला हातभार लागू शकेल. नवे मंत्री याबाबत काही आश्वासक घोषणा करीत असले तरी त्याची अंमलबजावणी कधी होईल याबाबत कोणतीही शाश्वती नसल्याने महामंडळ नजीकच्या काळात नफ्यात येण्याची सुतराम शक्यता नसल्याचे दिसून येते. महामंडळ नफ्यात यावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कितीही प्रयत्न केलेत तरी त्यांना शासननिर्णयाची जोड आवश्यक आहे. केवळ घोषणा आणि आश्वासने यांनी महामंडळाचा नफा वाढणार नाही तर त्याची अंमलबजावणीही यासाठी आवश्यक आहे आणि या अंमलबजावणीसाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवाशांनीही तितकाच आग्रह धरणे गरजेचे आहे. कारण जर महामंडळाचे खासगीकरण झाले तर हक्काच्या परिवहन सेवेला नागरिकांना मुकावे लागेल आणि महागड्या खासगी सेवेकडे वळावे लागेल.