शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

राजकीय ‘सर्जन’ उर्दू-मराठीचे नाते तोडू शकत नाही

By admin | Updated: October 4, 2015 22:54 IST

अब्दुल अहद साज : ‘दर्द आश्ना’च्या प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन

नाशिक : विदर्भापासून ते कोकणापर्यंत मी महाराष्ट्राचा दौरा केला असून, मला येथे मराठी-उर्दूचा अनोखा संगम बघावयास मिळाला. मुळात उर्दू ही भाषा कोणा एका जातीची किंवा धर्माची आहे हा निव्वळ गैरसमज आहे. उर्दू ही भारतीय भाषा असून, ती नेहमी भारतीयच राहील यात शंका नाही. मराठी-उर्दूचे अतुट नाते असून, हे नाते कोणीही राजकीय ‘सर्जन’ तोडू शकत नाही, असे मुंबई येथील ज्येष्ठ शायर अब्दुल अहद साज यांनी शायरीच्या शैलीत ठणकावून सांगितले.शहरातील उर्दू शायर फकिर महंमद ऊर्फ नासिर शकेब यांचा पाचवा उर्दू गझलसंग्रह ‘दर्द आश्ना’ हा देवनागरी भाषेतून प्रकाशित करण्यात आला. गंगापूररोड परिसरातील ‘हमसफर’च्या कलादालनात झालेल्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अब्दुल अहद प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा, राकेश माहेश्वरी, डॉ. अशोक पिंगळे, खान जाकिर, नासिर शकेब उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, उर्दू-मराठी या दोन्ही भाषा सख्ख्या जुळ्या बहिणींसारख्या आहेत. यांचा श्वास एकमेकांवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात उर्दूचा विस्तार झाला तो हिंदी-मराठी भाषांच्या आधारावरच. त्यामुळे उर्दूला मराठीपासून वेगळे करणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. शकेब यांनी यावेळी मनोगतातून शायरीचे महत्त्व विशद केले. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते ‘दर्द आश्ना’ गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी कव्वाली, गझल संगीताची सुरेख मैफल रंगली. यावेळी अ‍ॅड. प्रिया भुतडा, श्वेता भुतडा, निशिगंधा यांनी भर दो झोली मेरी.... ही कव्वाली, आज जाने की जिद ना करो...ही गझल, तसेच तेरी दिवानी... हे गीत सादर करत उपस्थित उर्दूप्रेमी श्रोत्यांना मुग्ध केले. प्रास्ताविक भुतडा यांनी केले. (प्रतिनिधी)