शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

आयारामांमुळे भाजपात नेत्यांविरुद्ध बंड!

By admin | Updated: January 17, 2017 01:01 IST

बैठकींना प्रारंभ : निष्ठावंतांनी काय सतरंज्याच उचलायच्या?

 नाशिक : भाजपाच्या स्थापनेपासून पक्षात काम करणाऱ्या किंबहुना पक्षात हयात घालविणाऱ्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत अच्छे दिनची आस असताना त्यांना दूर लोटून नाशिक भाजपाने आयारामांसाठी लाल गालीचे अंथरण्यास सुरुवात केली आहे. शहराध्यक्ष आणि अन्य आमदारांनी आपल्या मतदारसंघासाठी सोयीची राजकीय गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याने भाजपात बंड उभे राहण्यास प्रारंभ झाला आहे. नाराज निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकांना नाशिकमध्ये प्रारंभ झाला असून, त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी स्वबळावर म्हणजे शिवसेनेला बरोबर न घेता निवडणूक लढविणाऱ्या भाजपाला अनेक प्रभागात उमेदवार मिळाले नव्हते. शेवटच्या टप्प्यात मागेल त्याला ए बी फॉर्म दिले जात होते आणि आज प्रत्येक प्रभागात भाजपाकडे दहा ते वीस उमेदवार इच्छुक आहेत. त्यातच शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि पश्चिम मध्य नाशिकच्या आमदार सीमा हिरे तसेच अन्य अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य निवडणुकीत उतरविण्याची तयारी केली आहे. आपल्या वारसांना निवडून आणण्यासाठी आणि भविष्यातील महापौरपदावर विराजमान करण्यासाठी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी वाट्टेल त्या तडजोडी करीत असून, आगामी विधानसभा निवडणुतही विजयाचे समीकरण कसे जुळवता येईल त्यादृष्टीने विरोधी पक्षातील उमेदवारांसाठी पायघड्या टाकत आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि अनेक वर्षे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ज्यांच्याशी संघर्ष केला अशा आगंतुकांना उमेदवारी देण्यात येत असल्याने निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. यासंदर्भात रविवारी नाशिकरोड विभागातील भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली आणि पक्षात आलेल्या आयारामांना उमेदवारी देण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पंचवीस ते तीस वर्ष हयात घातली आणि आता फळे मिळण्याची वेळ आल्यानंतर मात्र बाहेरील उमेदवारांना संधी दिली जात आहे. कार्यकर्त्यांनी आयुष्यभर काही बैठकीसाठी संतरंजा टाकण्याचे आणि उचलण्याचेच काम करायचे काय, असा सवाल या बैठकीत करण्यात आला. या बैठकीनंतर आता पंचवटी आणि सिडको तसेच पश्चिम विभागातही बैठका घेण्याचे नियोजन सुरू आहे. अशा प्रकारच्या बैठका प्रत्येक प्रभागात होत राहिल्यास त्यातून वेगळ््याच प्रकारचा संदेश जाऊ शकतो. भाजपातील या नाराजीला वेळीच दूर केले नाही, तर निवडणुकीत भाजपालाच त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)