शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

कुलगुरूपदासाठी राजकीय हालचाली

By admin | Updated: January 10, 2016 23:51 IST

आरोग्य विद्यापीठ : उद्या जाहीर होणार यादी; राज्याबरोबरच केंद्रातूनही दबाव आणण्याचा प्रयत्न

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुलगुरूपदासाठी प्राप्त अर्जांची छाननीप्रक्रिया शुक्रवारी पार पडल्यानंतर मंगळवार, दि. १२ रोजी अंतिम ११ उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुकांनी राज्य, तसेच केंद्रातील मंत्र्यांचीदेखील मध्यस्थी वापरण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे समजते. कुलगुरूपदासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव वापरण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने काही इच्छुकांनी निवड समिती मेरीटऐवजी राजकीय वर्चस्वच ग्राह्य धरणार आहे का, असा सवालही उपस्थित केला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी गेल्या शुक्रवारी अर्जांची छाननी करण्यात आली. कुलगुरूपदासाठी अर्ज केलेल्या सुमारे २६ अर्जांपैकी अंतिम ११ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून, मंगळवारी ही नावे जाहीर केली जाणार असल्याचे समजते. अर्ज दाखल केल्यापासून याप्रकरणी राजकीय दबाव दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा आहे. केवळ राज्यातूनच नव्हे तर दिल्ली दरबारीदेखील अनेकांनी धाव घेतल्याचे समजते. असे असले तरी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. मात्र आता या निवडप्रक्रियेत महसूलमंत्री एकनाथ खडसे, तसेच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील काही नावांसाठी प्रयत्न चालविले असल्याचे वृत्त आहे. निवड समितीमध्ये आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे डॉ. निखिल टंडन, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट चंदीगढचे डॉ. योगेश चावला असल्याने या दोघांवर दिल्लीतून दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे बोलले जात आहे, तर राज्यातून मुख्यमंत्र्यांपासून इतर मंत्रीगणही कामाला लागल्याने एकूणच कुलगुरूपदासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कालपर्यंत जी नावे चर्चेत होती त्यामध्ये आणखी काही नावे पुन्हा चर्चेत आली आहेत. त्यामध्ये पुणे आणि मुंबईच्या दोन नावांची चर्चा आहे. यातील एक राज्यातील एका मंत्रीमहोदय यांचे नातेवाईक असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून काही इच्छुकांनी प्रयत्न चालविले आहेत. यातील दोन उमेदवार हे मंत्रीमहोद्वयांचे नातेवाईक असून, त्यांनी कुलगुरूपदासाठी राजकीय ताकदपणाला लावली आहे. तर कुलगुरूपदासाठी असलेली चुरस लक्षात घेता राजकीय मानापमान टाळण्यासाठी महिला उमेदवाराची निवड करण्यात यावी, असाही एक मतप्रवाह तयार झाला आहे. अर्थात याबाबतचे दररोज नवनवीन वृत्त समोर येत आहेत. (प्रतिनिधी)