शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
2
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
3
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
4
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
5
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
6
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
7
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
8
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
9
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
10
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
11
Laxmi Pujan 2025: स्थिर लक्ष्मी हवी? लक्ष्मीपूजन करताना झाडू आणि खडे मीठाने करा 'हा' खास उपाय!
12
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
13
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपोर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
14
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
15
Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!
16
बॉस असावा तर असा! सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या ५१ आलिशान कार
17
‎‘भूपती-रुपेश गद्दार!', माओवाद्यांच्या‎ केंद्रीय समितीची आगपाखड; २७० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीत खदखद
18
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
19
प्रेम, अनैतिक संबंध अन् ३ हत्या! घरात सुरू होती दिवाळीची तयारी, पण पत्नीची एक चूक जीवावर बेतली
20
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स

राजकारण्यानो सावधान! राजकीय कूस बदलतेय...

By किरण अग्रवाल | Updated: January 21, 2021 09:14 IST

Gram Panchayat Election: निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असोत, की विधानसभा व लोकसभेच्या, त्यात अनेक ठिकाणी घटणाऱ्या मतदानाचा टक्का हा अलीकडे चिंतेचा विषय बनला आहे. कोणीही निवडून येवो, सारे एकाच माळेचे मणी असतात असाच अनुभव अधिकतर येऊ लागल्याने लोक मतदानासाठी न जाता त्यादिवशी पर्यटनास निघून जातात असेही पहावयास मिळते.

किरण अग्रवाल

ग्रामविकासाचा खऱ्या अर्थाने पाया म्हणवणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाने मतदारांची बदलती मानसिकताच अधोरेखित करून दिली आहे. गावकीचे राजकारण व तेथील भाऊबंदकीचे फॅक्टर्स प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात, त्यात राजकीय पक्ष व भूमिकांचा तितकासा संबंध नसतो हे खरेच; पण तसे असले तरी ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या नवोदितांवरील विश्वासाचे जे एक कॉमन सूत्र यात आढळून येते ते आशा उंचावणारेच म्हणता यावे. कोरोनासारख्या महामारीचे संकट असतानाही मतदानासाठी दिसून आलेला उत्साह व त्यानंतर लागलेले निकाल बारकाईने बघितले तर त्यातून बदलाचे संकेत घेता यावेत. पारंपरिकपणे मळलेल्या वाटेवरून न जाता राजकीय बड्यांना धक्के देत विकासाच्या स्वप्नांना मूर्त रूप देऊ शकणाऱ्या शिकल्या-सवरल्या होतकरू तरुणांना अनेक ठिकाणी मतदारांनी संधी दिल्याचे व परिवर्तन घडविल्याचे पाहता राजकारणातील स्वच्छताकरणाचा प्रारंभ ग्रामपालिकांपासून होऊन गेल्याचे म्हणता यावे.निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असोत, की विधानसभा व लोकसभेच्या, त्यात अनेक ठिकाणी घटणाऱ्या मतदानाचा टक्का हा अलीकडे चिंतेचा विषय बनला आहे. कोणीही निवडून येवो, सारे एकाच माळेचे मणी असतात असाच अनुभव अधिकतर येऊ लागल्याने लोक मतदानासाठी न जाता त्यादिवशी पर्यटनास निघून जातात असेही पहावयास मिळते. राजकारणावरील विश्वास डळमळत चालल्याचे हे चित्र आहे. निवडणूक लढणारे राजकीय पक्ष व उमेदवारांकडून त्या-त्यावेळी राजकीय मशागत केली जात असताना प्रशासनाला व समाजसेवी संस्थांना मात्र जनजागरणाच्या मोहिमा राबवून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते म्हणूनच. पण याच स्थितीत अलीकडेच झालेल्या राज्यातील सुमारे बाराशेवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जागोजागी मतदारांनी रांगा लावून मतदानास गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. विशेषत: कोरोनाच्या महामारीचे संकट असताना त्यासंबंधीची भीती दूर सारून मतदारांनी लोकशाहीचा उत्सव म्हणवणार्‍या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदान केले, परिणामी यंदा बहुसंख्य ठिकाणी मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला. शहरीमतदारांपेक्षा ग्रामीण भागातील मतदारांची ही सजगता खरेच कौतुकास्पद अशीच आहे. मतदारांच्या जागरूकतेचीच ही निशाणी असून, तीच बदलाची नांदी म्हणता यावी.महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायतींच्या निवडणुका राजकीय पक्षांतर्फे किंवा पक्ष चिन्हांवर लढल्या जात नाहीत. व्यक्ती वा नेत्यांचे राजकीय लागेबांधे बघता पक्षांना यातील विजयात आपले समाधान शोधता येते, त्या दृष्टीने या निवडणुकीतही आपल्यालाच सर्वाधिक जागांवर विजय मिळाल्याचे दावे बहुतेक सर्वच पक्षांनी केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व शिवसेनेच्या नेत्यांप्रमाणेच भाजपचे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटीलदेखील म्हणतात की, सर्वाधिक जागा आम्हालाच मिळाल्या आहेत म्हणून. तेव्हा आकडे घटकाभर बाजूस ठेवूया; पण यंदा अनेक ठिकाणी वीस-वीस, पंचवीस -पंचवीस वर्षांपासूनच्या सत्ता उलथवून परिवर्तन घडल्याचे व तरुणांच्या हाती सत्ता सोपविली गेल्याचे दिसून आले हे कुणासही नाकारता येऊ नये. ज्यांचे काम चांगले आहे व जे मतदारांच्या पसंतीस खरे ठरले आहेत त्यांना पुन्हा संधी मिळाली, मात्र अनेक ठिकाणी भल्याभल्यांना धोबीपछाड देत तरुणांकडे सूत्रे सोपविली गेलीत. नावेच घ्यायची तर भाजपचे चंद्रकांत पाटील,विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, मातब्बर नेते पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील आदींच्या प्रभावक्षेत्रात त्यांच्या समर्थकांना अपेक्षित यश लाभू शकले नाही. हेच नेते नव्हेत, तर त्या त्या ठिकाणच्या अन्य मातब्बरांनाही धक्के पचवावे लागलेत. ही धक्का देण्यामागील मानसिकता व भूमिका महत्त्वाची ठरावी.मतदारांना गृहीत धरून राजकारण करण्याचे दिवस संपलेत तसेच मतदारांना प्रलोभने देऊन आपल्याकडे वळवण्याचा फंडाही आता कामी येत नाही, इतके मतदार सजग होऊ लागले आहेत. विकासाची क्षमता कुणात आहे हे त्यांना समजू लागले आहे व त्यासाठी नवोदितांवर त्यांचा विश्वास दिसून येत आहे ही परिवर्तनाची लक्षणे ठरावीत. राजकीयदृष्ट्या विचार करता महाआघाडीचा फार्म्यूला तर कामी येताना दिसतोच; पण ग्रामीण भागात आजवर वर्चस्व राखणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या बरोबरीने भाजपही आता तेथे पाय रोवू लागल्याचे या निकालात दिसून आले आहे. त्याखेरीज आतापर्यंत शहरी पक्षांची ओळख असलेल्या मनसे व आम आदमी पक्षालाही या निवडणुकीत यश लाभल्याने त्यांचा पाया विस्तारत असल्याचे स्पष्ट व्हावे. राजकारणाची कूस बदलू पहात असल्याचीच ही लक्षणे म्हणायला हवीत. मतदारराजा जसजसा सजग होईल व ऊर्जा तसेच नवी उमेद घेऊन काम करू पाहणाऱ्या तरुणांचे सत्तेतील प्रतिनिधित्व वाढत जाईल, तसतसे राजकारणातील स्वच्छताकरणाच्या प्रक्रियेला गतिमानता लाभून जाईल हाच संकेत यातून घ्यायचा.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक