शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राजकारण्यानो सावधान! राजकीय कूस बदलतेय...

By किरण अग्रवाल | Updated: January 21, 2021 09:14 IST

Gram Panchayat Election: निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असोत, की विधानसभा व लोकसभेच्या, त्यात अनेक ठिकाणी घटणाऱ्या मतदानाचा टक्का हा अलीकडे चिंतेचा विषय बनला आहे. कोणीही निवडून येवो, सारे एकाच माळेचे मणी असतात असाच अनुभव अधिकतर येऊ लागल्याने लोक मतदानासाठी न जाता त्यादिवशी पर्यटनास निघून जातात असेही पहावयास मिळते.

किरण अग्रवाल

ग्रामविकासाचा खऱ्या अर्थाने पाया म्हणवणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाने मतदारांची बदलती मानसिकताच अधोरेखित करून दिली आहे. गावकीचे राजकारण व तेथील भाऊबंदकीचे फॅक्टर्स प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात, त्यात राजकीय पक्ष व भूमिकांचा तितकासा संबंध नसतो हे खरेच; पण तसे असले तरी ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या नवोदितांवरील विश्वासाचे जे एक कॉमन सूत्र यात आढळून येते ते आशा उंचावणारेच म्हणता यावे. कोरोनासारख्या महामारीचे संकट असतानाही मतदानासाठी दिसून आलेला उत्साह व त्यानंतर लागलेले निकाल बारकाईने बघितले तर त्यातून बदलाचे संकेत घेता यावेत. पारंपरिकपणे मळलेल्या वाटेवरून न जाता राजकीय बड्यांना धक्के देत विकासाच्या स्वप्नांना मूर्त रूप देऊ शकणाऱ्या शिकल्या-सवरल्या होतकरू तरुणांना अनेक ठिकाणी मतदारांनी संधी दिल्याचे व परिवर्तन घडविल्याचे पाहता राजकारणातील स्वच्छताकरणाचा प्रारंभ ग्रामपालिकांपासून होऊन गेल्याचे म्हणता यावे.निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असोत, की विधानसभा व लोकसभेच्या, त्यात अनेक ठिकाणी घटणाऱ्या मतदानाचा टक्का हा अलीकडे चिंतेचा विषय बनला आहे. कोणीही निवडून येवो, सारे एकाच माळेचे मणी असतात असाच अनुभव अधिकतर येऊ लागल्याने लोक मतदानासाठी न जाता त्यादिवशी पर्यटनास निघून जातात असेही पहावयास मिळते. राजकारणावरील विश्वास डळमळत चालल्याचे हे चित्र आहे. निवडणूक लढणारे राजकीय पक्ष व उमेदवारांकडून त्या-त्यावेळी राजकीय मशागत केली जात असताना प्रशासनाला व समाजसेवी संस्थांना मात्र जनजागरणाच्या मोहिमा राबवून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते म्हणूनच. पण याच स्थितीत अलीकडेच झालेल्या राज्यातील सुमारे बाराशेवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जागोजागी मतदारांनी रांगा लावून मतदानास गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. विशेषत: कोरोनाच्या महामारीचे संकट असताना त्यासंबंधीची भीती दूर सारून मतदारांनी लोकशाहीचा उत्सव म्हणवणार्‍या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदान केले, परिणामी यंदा बहुसंख्य ठिकाणी मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला. शहरीमतदारांपेक्षा ग्रामीण भागातील मतदारांची ही सजगता खरेच कौतुकास्पद अशीच आहे. मतदारांच्या जागरूकतेचीच ही निशाणी असून, तीच बदलाची नांदी म्हणता यावी.महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायतींच्या निवडणुका राजकीय पक्षांतर्फे किंवा पक्ष चिन्हांवर लढल्या जात नाहीत. व्यक्ती वा नेत्यांचे राजकीय लागेबांधे बघता पक्षांना यातील विजयात आपले समाधान शोधता येते, त्या दृष्टीने या निवडणुकीतही आपल्यालाच सर्वाधिक जागांवर विजय मिळाल्याचे दावे बहुतेक सर्वच पक्षांनी केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व शिवसेनेच्या नेत्यांप्रमाणेच भाजपचे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटीलदेखील म्हणतात की, सर्वाधिक जागा आम्हालाच मिळाल्या आहेत म्हणून. तेव्हा आकडे घटकाभर बाजूस ठेवूया; पण यंदा अनेक ठिकाणी वीस-वीस, पंचवीस -पंचवीस वर्षांपासूनच्या सत्ता उलथवून परिवर्तन घडल्याचे व तरुणांच्या हाती सत्ता सोपविली गेल्याचे दिसून आले हे कुणासही नाकारता येऊ नये. ज्यांचे काम चांगले आहे व जे मतदारांच्या पसंतीस खरे ठरले आहेत त्यांना पुन्हा संधी मिळाली, मात्र अनेक ठिकाणी भल्याभल्यांना धोबीपछाड देत तरुणांकडे सूत्रे सोपविली गेलीत. नावेच घ्यायची तर भाजपचे चंद्रकांत पाटील,विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, मातब्बर नेते पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील आदींच्या प्रभावक्षेत्रात त्यांच्या समर्थकांना अपेक्षित यश लाभू शकले नाही. हेच नेते नव्हेत, तर त्या त्या ठिकाणच्या अन्य मातब्बरांनाही धक्के पचवावे लागलेत. ही धक्का देण्यामागील मानसिकता व भूमिका महत्त्वाची ठरावी.मतदारांना गृहीत धरून राजकारण करण्याचे दिवस संपलेत तसेच मतदारांना प्रलोभने देऊन आपल्याकडे वळवण्याचा फंडाही आता कामी येत नाही, इतके मतदार सजग होऊ लागले आहेत. विकासाची क्षमता कुणात आहे हे त्यांना समजू लागले आहे व त्यासाठी नवोदितांवर त्यांचा विश्वास दिसून येत आहे ही परिवर्तनाची लक्षणे ठरावीत. राजकीयदृष्ट्या विचार करता महाआघाडीचा फार्म्यूला तर कामी येताना दिसतोच; पण ग्रामीण भागात आजवर वर्चस्व राखणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या बरोबरीने भाजपही आता तेथे पाय रोवू लागल्याचे या निकालात दिसून आले आहे. त्याखेरीज आतापर्यंत शहरी पक्षांची ओळख असलेल्या मनसे व आम आदमी पक्षालाही या निवडणुकीत यश लाभल्याने त्यांचा पाया विस्तारत असल्याचे स्पष्ट व्हावे. राजकारणाची कूस बदलू पहात असल्याचीच ही लक्षणे म्हणायला हवीत. मतदारराजा जसजसा सजग होईल व ऊर्जा तसेच नवी उमेद घेऊन काम करू पाहणाऱ्या तरुणांचे सत्तेतील प्रतिनिधित्व वाढत जाईल, तसतसे राजकारणातील स्वच्छताकरणाच्या प्रक्रियेला गतिमानता लाभून जाईल हाच संकेत यातून घ्यायचा.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक