शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

पेट्रोल पंपावर पोलीस; गुन्हेगारांना मोकळे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST

सिडको : नागरिकांना दुचाकी चालविताना हेल्मेट सक्तीचे करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पेट्रोल पंपावर हेल्मेट असेल तरच पेट्रोल दिले जाईल, ...

सिडको : नागरिकांना दुचाकी चालविताना हेल्मेट सक्तीचे करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पेट्रोल पंपावर हेल्मेट असेल तरच पेट्रोल दिले जाईल, अशी भूमिका घेऊन प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त दिला आहे. परंतु अगोदरच पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असताना त्यातच २४ तासांसाठी पेट्रोलपंपावर पोलिसांची नेमणूक करण्यात आल्याने गुन्हेगारी रोखण्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अठराहून अधिक पेट्रोल पंप असून, प्रत्येक पंपावर पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. या पोलिसांना पेट्रोल पंपावर येणाऱ्या नागरिकांकडे हेल्मेट नसेल तर त्यांना पेट्रोल भरून न देणे तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन शिफ्टमधील अठराहून अधिक कर्मचारी दररोज सकाळी सहा ते रात्री दहा याच कामात व्यस्त आहेत. मुळात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडकोसह परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. मागील एकाच महिन्यात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन खुनाच्या घटनादेखील घडल्या आहेत. याबरोबरच चौकाचौकात तसेच उद्यानामधील टवाळखोर यांच्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परंतु असे असले तरी पोलिसांकडून मात्र यावर अंकुश ठेवण्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. पोलीस आयुक्तांनी केलेली हेल्मेट सक्तीची कारवाई यापुढील काळात अधिक जोमाने राबविण्याचा प्रशासनाचा विचार असला तरी परिसरातील वाढती गुन्हेगारी हेदेखील पोलिसांपुढे एक मोठे आव्हान आहे. यामुळे त्याकडेदेखील पोलिसांनी लक्ष देण्याची गरज असून, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीचा विचार केला तर सिडको, अंबड एमआयडीसी, घरकुल, चुंचाळे, खुटवड नगर, जुने सिडको, उत्तम नगर, त्रिमूर्ती चौक, शुभम पार्क, उंटवाडी, उपेंद्र नगर असा मोठा परिसर आहे. महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने अनेक गुन्हेगारांनीदेखील डोकेवर काढल्याने त्याला आळा घालण्यासाठी पोलीस अपुरे पडू लागले आहेत. दोन दिवसांवरच गणेशोत्सव येऊ घातला असून, यामुळेदेखील पोलिसांवरील ताण अधिक वाढणार आहे. असे असताना पोलिसांकडून नो हेल्मेट नो पेट्रोल ही मोहीम राबवली जात असली तरी याबरोबरच वाढत्या गुन्हेगारीकडेदेखील पोलीस आयुक्तांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.