शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

पोलीस यंत्रणा अपयशीच !

By admin | Updated: May 10, 2017 00:34 IST

सोनसाखळी चोरीच्या घटना व यशस्वी तपासामधील तफावत पाहता पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जात असून, वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे़

विजय मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्याबरोबरच चोरट्यांचा शोध घेणे शहर पोलिसांसाठी आव्हान असून, गेल्या सव्वासहा वर्षांचा विचार करता सोनसाखळी चोरीच्या ८४0 घटनांपैकी अवघ्या २६८ गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे़ सोनसाखळी चोरीच्या घटना व यशस्वी तपासामधील तफावत पाहता पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जात असून, वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे़ शहरातील इंदिरानगर, गंगापूर, उपनगर, पंचवटी, नाशिकरोड, म्हसरूळ या पोलीस ठाणे हद्दीत सकाळी-सायंकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या महिला या सोनसाखळी चोरट्यांच्या रडारवर असतात़ धूम स्टाइलने दुचाकीवर येऊन पाठीमागून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचायचे तर कधी पत्ता विचारण्याचा बहाणा अशा या क्लृप्त्या या चोरट्यांकडून वापरल्या जातात़ विशेष म्हणजे काम फत्ते झाल्यानंतर चोरटे क्षणार्धात पलायन करतात अन् पोलिसांच्या नाकाबंदीतही ते हाती लागत नाहीत़ सद्यस्थितीत लग्नसराईचे दिवस असल्याने तसेच मुलांना सुटी असल्याने महिला खरेदीसाठी बाहेर पडतात़ दुचाकीवरून येऊन रस्त्यावरून जाणाऱ्या महिला वा वृद्धांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा सोनसाखळी चोरटे खेचून नेतात़ सोनसाखळी खेचल्यानंतर चोरट्यांना पळ काढण्यात यश येत असल्याने पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येते़ शहरात सोनसाखळीची घटना घडत नाही, असा एखादाच दिवस जातो़ विशेष म्हणजे या सोनसाखळी चोरट्यांना आवर घालण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते़  सोनसाखळी चोरीतील कमी धोका, कमी श्रम, गुन्हे करण्यास सोपे, पकडले जाण्याची शक्यता कमी, चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणे सोपे. यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली असून, या घटनांमध्येही वाढ झाली आहे़ एक दुचाकी (शक्यतो चोरीची) अन् चालविण्यासाठी साथीदार, एवढेच भांडवल यासाठी पुरेसे असते. तसेच चोरलेले दागिने ठरलेल्या सराफाच्या दुकानात विक्री केले जातात, तर कमी भावात मिळणारे हे सोने सराफ ांकडून विकत घेतले जात असल्याने सहज पैसे मिळतात़ सराफाने सोने वितळून त्याची चीप बनविली की पुरावा संपला, असे या चोरट्यांना वाटते. शहर पोलीस आयुक्तालयात २०१४ पासून सोनसाखळी चोरीच्या घटनांची उकल करण्याचे प्रमाण अत्यल्प कमी आहे़ पोलिसांनी जनजागृतीबरोबरच चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे़