शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पोलिसांचा कानाडोळा : त्रस्त नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By admin | Updated: March 22, 2015 23:39 IST

पंचवटीत कुंटणखान्याबरोबरच अमलीपदार्थांचा व्यवसाय

नाशिक : सराईत गुन्हेगारांनी एकत्र येऊन स्थानिक पोलीस आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून पंचवटीतील एका रहिवासी क्षेत्रात कुंटणखाना व अमलीपदार्थांचा व्यवसाय सुरू केला आहे़ विशेष म्हणजे याची तक्रार करणाऱ्यास या गुंडांकडून जिवे ठार मारण्याची धमकी दिली जाते आहे़ पोलिसांचा वरदहस्त व गुंडांमध्ये भरडल्या गेलेल्या स्थानिक रहिवाशांनी जिवाची भीती बाजूला सारत अखेर मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांना निनावी पत्र पाठवून आपली कैफियत मांडली आहे़विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, दरोडा, जबरी लूट, विनयभंग, खंडणी अशा स्वरूपाचे वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांनी एकत्र येऊन पंचवटीतील रासबिहारी शाळेमागील मुंबई-आग्रावरील एका फार्ममध्ये सुमारे पंधरा-वीस बांगलादेशी व स्थानिक अल्पवयीन मुली आणून देहविक्री व अमली पदार्थ व्यापार सुरू केल्याचे या पत्रात म्हटले आहे़ या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असता त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने तक्रार करण्यास कोणी पुढे येत नाही़या सराईत गुन्हेगारांशी स्थानिक पोलीस व अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध मजबूत असल्याने कारवाई केली जात नाही याउलट नागरिकांनाच धमकावून गप्प केले जाते़ या अनैतिक धंद्याच्या जीवघेण्या स्पर्धेतून खुनाचे प्रकारही घडल्याचे या पत्रात म्हटले आहे़ या अवैध धंद्यांमुळे परिसरातील महिला, मुली, तरुणी व नागरिकांचे घराबाहेर फिरणे धोकेदायक बनले आहे़ अमली पदार्थाच्या नशेतील माणसं तरुणींचा विनयभंग करतात याची तक्रार करण्यास गेल्यास हे गुन्हेगार नागरिक व महिलांना बंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत असल्याचे पत्रात नमूद आहे.या परिसरातील कुंटणखाना व अमलीपदार्थांचा व्यापार बंद करण्याची मागणी येथील त्रस्त रहिवाशांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निनावी पत्राद्वारे केली आहे़ (प्रतिनिधी)