शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पहिने पिकनिक पॉइंटवर पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:58 IST

त्र्यंबकेश्वर : कोरोना संसर्गामुळे तालुक्यातील व नाशिकपासून अवघ्या ३९ किमी अंतरावर असलेल्या निसर्गरम्य व निसर्गाने मुक्त हाताने उधळण केलेल्या पहिने या छोटेखानी खेडेगावाच्या परिसरात असलेला पिकनिक पॉइंट व तेथील निसर्गरम्य परिसर सध्या ओस पडला आहे.

त्र्यंबकेश्वर : कोरोना संसर्गामुळे तालुक्यातील व नाशिकपासून अवघ्या ३९ किमी अंतरावर असलेल्या निसर्गरम्य व निसर्गाने मुक्त हाताने उधळण केलेल्या पहिने या छोटेखानी खेडेगावाच्या परिसरात असलेला पिकनिक पॉइंट व तेथील निसर्गरम्य परिसर सध्या ओस पडला आहे.येथे पर्यटनप्रेमी व भाविक निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. श्री त्र्यंबकराजाचे दर्शन व त्यातच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोक आवर्जून येत असतात. मात्र सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दीमुळे संसर्ग वाढू शकतो. या कारणावरून पहिने येथे नाशिक, त्र्यंबक, घोटी व वाडीवºहे या तीनही पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.पहिने परिसरात पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. परिणामी नेहमी गर्दीने ओसंडणारा परिसर निर्मनुष्य व ओस पडलेला आहे. अगदीच तुरळक फिरायला आलेले हौशी पर्यटक निसर्गप्रेमी पहायला मिळतात. पावसाने विश्रांती घेतली असून, पहिने परिसरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पेगलवाडी फाटा, पहिने-देवगाव रस्ता येथे त्र्यंबकेश्वर आणि वाडीवºहे पोलिसांकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे पथकासह पेगलवाडी फाटा ते तोरंगण घाट या परिसरात लक्ष ठेवून आहेत.-------------मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या गिरणा धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.सध्या कोरोनाकाळात पर्यटन व जिल्हाबंदी असतानाही धरणावर पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. या ठिकाणच्या नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी रोखताना दमछाक होत आहे. मालेगाव शहरापासून अवघ्या २५ ते २६ किलोमीटरवर असलेल्या गिरणा धरणावर सध्या शासनाच्या नियमांना व कोरोनाबंदीला हरताळ फासून नागरिक गर्दी करताना दिसतआहेत.पाच तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाºया या धरणावर नागरिक नेहमीच गर्दी करीत असतात. मात्र सध्या सर्वत्र कोरोना रोगाने धुमाकूळ घातला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत. शासनाने लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीदेखील मालेगाव, नांदगाव, मनमाड, धुळे, चाळीसगाव, जळगाव येथील हौसी पर्यटक गिरणा धरणाकडे धाव घेत आहेत. सध्या गिरणा धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी एका खासगी एजन्सीला देण्यात आली आहे. दिवसा व रात्री प्रत्येकी चार कर्मचाºयांच्या भरोशावर सुरक्षा ठेवली जात आहे. शासनाच्या वतीने एक शाखा अभियंता, तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या अपुºया कर्मचारीवर्गामुळे सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणे शक्य होत नसल्याचा दावा अधिकाºयांकडून केला जात आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक