शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पहिने पिकनिक पॉइंटवर पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:58 IST

त्र्यंबकेश्वर : कोरोना संसर्गामुळे तालुक्यातील व नाशिकपासून अवघ्या ३९ किमी अंतरावर असलेल्या निसर्गरम्य व निसर्गाने मुक्त हाताने उधळण केलेल्या पहिने या छोटेखानी खेडेगावाच्या परिसरात असलेला पिकनिक पॉइंट व तेथील निसर्गरम्य परिसर सध्या ओस पडला आहे.

त्र्यंबकेश्वर : कोरोना संसर्गामुळे तालुक्यातील व नाशिकपासून अवघ्या ३९ किमी अंतरावर असलेल्या निसर्गरम्य व निसर्गाने मुक्त हाताने उधळण केलेल्या पहिने या छोटेखानी खेडेगावाच्या परिसरात असलेला पिकनिक पॉइंट व तेथील निसर्गरम्य परिसर सध्या ओस पडला आहे.येथे पर्यटनप्रेमी व भाविक निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. श्री त्र्यंबकराजाचे दर्शन व त्यातच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोक आवर्जून येत असतात. मात्र सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दीमुळे संसर्ग वाढू शकतो. या कारणावरून पहिने येथे नाशिक, त्र्यंबक, घोटी व वाडीवºहे या तीनही पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.पहिने परिसरात पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. परिणामी नेहमी गर्दीने ओसंडणारा परिसर निर्मनुष्य व ओस पडलेला आहे. अगदीच तुरळक फिरायला आलेले हौशी पर्यटक निसर्गप्रेमी पहायला मिळतात. पावसाने विश्रांती घेतली असून, पहिने परिसरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पेगलवाडी फाटा, पहिने-देवगाव रस्ता येथे त्र्यंबकेश्वर आणि वाडीवºहे पोलिसांकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे पथकासह पेगलवाडी फाटा ते तोरंगण घाट या परिसरात लक्ष ठेवून आहेत.-------------मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या गिरणा धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.सध्या कोरोनाकाळात पर्यटन व जिल्हाबंदी असतानाही धरणावर पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. या ठिकाणच्या नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी रोखताना दमछाक होत आहे. मालेगाव शहरापासून अवघ्या २५ ते २६ किलोमीटरवर असलेल्या गिरणा धरणावर सध्या शासनाच्या नियमांना व कोरोनाबंदीला हरताळ फासून नागरिक गर्दी करताना दिसतआहेत.पाच तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाºया या धरणावर नागरिक नेहमीच गर्दी करीत असतात. मात्र सध्या सर्वत्र कोरोना रोगाने धुमाकूळ घातला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत. शासनाने लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीदेखील मालेगाव, नांदगाव, मनमाड, धुळे, चाळीसगाव, जळगाव येथील हौसी पर्यटक गिरणा धरणाकडे धाव घेत आहेत. सध्या गिरणा धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी एका खासगी एजन्सीला देण्यात आली आहे. दिवसा व रात्री प्रत्येकी चार कर्मचाºयांच्या भरोशावर सुरक्षा ठेवली जात आहे. शासनाच्या वतीने एक शाखा अभियंता, तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या अपुºया कर्मचारीवर्गामुळे सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणे शक्य होत नसल्याचा दावा अधिकाºयांकडून केला जात आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक