शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

पोलिसांची नाकाबंदी तरीही घडते सोनसाखळी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:14 IST

----- नाशिक : सोनसाखळी चोरांच्या टोळीने नाशिक शहरात धुमाकूळ माजविला आहे. दरदिवसाआड एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून ...

-----

नाशिक : सोनसाखळी चोरांच्या टोळीने नाशिक शहरात धुमाकूळ माजविला आहे. दरदिवसाआड एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई नाका पोलिसांची नाकाबंदी अशोका पोलीस चौकीजवळ सुरू असतानासुद्धा चोरट्याने पखालरोडवर एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली.

दोन दिवसांपूर्वी म्हसरूळ, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मखमालाबादरोडवर आणि काठेगल्लीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यानी हिसकावून नेली होती. तसेच तत्पूर्वी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत अशाप्रकारे सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. या घटनांचा तपास पोलिसांकडून सुरू केला जात नाही तोच आता पुन्हा मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत पखालरोडवर श्री अय्यपा मंदिराजवळ अर्चना अतुल अन्नदाते (४५, रा.गुरू अय्यपन अपार्टमेंट, खोडेनगर) यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची सुमारे २५ ग्रॅमची सोनसाखळीतील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीने आलेला चोरटा फरार झाला. ही घटना शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली तेथून पुढे अशोका पोलीस चौकीकडे सिग्नलवर बॅरिकेड टाकून रस्ता आठ वाजताच बंद केला जातो तरीदेखील सोनसाखळी हिसकावून नेणारा चोरटा निसटून जाण्यास यशस्वी ठरला. अन्नदाते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे शहरातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी बॅरिकेड टाकून रस्ते बंद केले जात आहे, तरी दुसरीकडे मात्र सोनसाखळी चोरीचे गुन्हे सर्रासपणे घडत असून, चोरटे नाकाबंदीतून निसटताच कसे? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

------इन्फो-----

जेथे बॅरिकेडिंग तेथूनच हिसकावली सोनसाखळी

मुंबईनाका पोलिसांकडून पखालरोड हा दोन्ही बाजूंनी सिग्नलवर बॅरिकेड टाकून रात्रीच्या वेळी बंद केला जातो तसेच वडाळारोड, साईनाथनगरचा प्रमुख रस्ताही रात्री ८ वाजताच शिवाजीवाडी येथून बॅरिकेड टाकून अडविला जातो तरीदेखील या नाकाबंदीत सोनसाखळी चोर सापडत नाही आणि पोलिसांच्या हातावर तुरी देत चोरटे पसार होतात हे विशेष, अन पोलीस मात्र नाकाबंदी करताना सर्वसामान्य लोकांना वेठीस धरून त्यांची उलटतपासणी करण्यातच रस दाखवीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे नागरिकांची अडवणूक अन् गुन्हेगारांना मोकळीक दिली जात आहे का? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.