शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

पोलिसांची नाकाबंदी तरीही घडते सोनसाखळी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:14 IST

----- नाशिक : सोनसाखळी चोरांच्या टोळीने नाशिक शहरात धुमाकूळ माजविला आहे. दरदिवसाआड एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून ...

-----

नाशिक : सोनसाखळी चोरांच्या टोळीने नाशिक शहरात धुमाकूळ माजविला आहे. दरदिवसाआड एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई नाका पोलिसांची नाकाबंदी अशोका पोलीस चौकीजवळ सुरू असतानासुद्धा चोरट्याने पखालरोडवर एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली.

दोन दिवसांपूर्वी म्हसरूळ, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मखमालाबादरोडवर आणि काठेगल्लीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यानी हिसकावून नेली होती. तसेच तत्पूर्वी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत अशाप्रकारे सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. या घटनांचा तपास पोलिसांकडून सुरू केला जात नाही तोच आता पुन्हा मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत पखालरोडवर श्री अय्यपा मंदिराजवळ अर्चना अतुल अन्नदाते (४५, रा.गुरू अय्यपन अपार्टमेंट, खोडेनगर) यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची सुमारे २५ ग्रॅमची सोनसाखळीतील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीने आलेला चोरटा फरार झाला. ही घटना शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली तेथून पुढे अशोका पोलीस चौकीकडे सिग्नलवर बॅरिकेड टाकून रस्ता आठ वाजताच बंद केला जातो तरीदेखील सोनसाखळी हिसकावून नेणारा चोरटा निसटून जाण्यास यशस्वी ठरला. अन्नदाते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे शहरातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी बॅरिकेड टाकून रस्ते बंद केले जात आहे, तरी दुसरीकडे मात्र सोनसाखळी चोरीचे गुन्हे सर्रासपणे घडत असून, चोरटे नाकाबंदीतून निसटताच कसे? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

------इन्फो-----

जेथे बॅरिकेडिंग तेथूनच हिसकावली सोनसाखळी

मुंबईनाका पोलिसांकडून पखालरोड हा दोन्ही बाजूंनी सिग्नलवर बॅरिकेड टाकून रात्रीच्या वेळी बंद केला जातो तसेच वडाळारोड, साईनाथनगरचा प्रमुख रस्ताही रात्री ८ वाजताच शिवाजीवाडी येथून बॅरिकेड टाकून अडविला जातो तरीदेखील या नाकाबंदीत सोनसाखळी चोर सापडत नाही आणि पोलिसांच्या हातावर तुरी देत चोरटे पसार होतात हे विशेष, अन पोलीस मात्र नाकाबंदी करताना सर्वसामान्य लोकांना वेठीस धरून त्यांची उलटतपासणी करण्यातच रस दाखवीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे नागरिकांची अडवणूक अन् गुन्हेगारांना मोकळीक दिली जात आहे का? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.