शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

संस्कृतीसह भाषेचे  वहन करतो कवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 00:51 IST

जगातील प्रत्येक कवी हा संस्कृती आणि भाषेच्या वहनाचे कार्य करतो. मात्र, कोणत्याही कारणास्तव मराठी भाषा लादणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. 

नाशिक : जगातील प्रत्येक कवी हा संस्कृती आणि भाषेच्या वहनाचे कार्य करतो. मात्र, कोणत्याही कारणास्तव मराठी भाषा लादणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. नाशिकचे कवी राजू देसले यांच्या ‘अवघेचि उच्चार’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारक येथे या प्रकाशन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रंगनाथ पाठारे यांनी कवी राजू देसले यांनी लिहिलेल्या कविता या मराठी साहित्याला मिळालेल्या नवीन दमाच्या आणि  नव्या प्रकारातील कविता असून या कवितांच्या शब्दाशब्दात फटकारे असल्याचे सांगितले. त्यात शब्दांच्या पलिकडे जाण्याची असोशी असल्याचे सांगितले. अभिनेते किशोर कदम तथा सौमित्र यांनी कवी राजू देसले हे नाशिकचा चालताबोलता संदर्भ असल्याचे सांगितले. अभिनेते तथा लेखक दीपक करंजीकर यांनी ज्याच्या चिंतनात अखंड माणसं आहेत, अशा व्यक्तीकडून येणारी कविता  वेगळीच असते, अशी आशा व्यक्त केली. प्रवीण बांदेकर,मंगेश काळे,  गोविंद काजरेकर, सरबजीत गरचा यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर विश्वास समूहाचे प्रमुख विश्वास ठाकूर, प्रवीण  बांदेकर, मंगेश काळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश होळकर यांनी केले. 

मराठी लादणे चुकीचे अलिकडच्या काळात मराठी भाषेसंदर्भात राजकीय पक्षांकडून मराठी पाट्या लावण्यासंदर्भात आणि मराठी साहित्य विक्रीला ठेवण्यासाठी आंदोलने केली जातात. हे निव्वळ मूर्खपणाचे लक्षण असल्याचे सांगत मराठी पण सिध्द करायची गरज भासायला नको, हा व्यवसाय असून याप्रकारे मराठी भाषा लादणे चुकीचे ठरेल असे परखड मत रंगनाथ पठारे यांनी कुठल्याही राजकीय पक्षाचे नाव घेता मांडले. 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक