शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

संस्कृतीसह भाषेचे  वहन करतो कवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 00:51 IST

जगातील प्रत्येक कवी हा संस्कृती आणि भाषेच्या वहनाचे कार्य करतो. मात्र, कोणत्याही कारणास्तव मराठी भाषा लादणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. 

नाशिक : जगातील प्रत्येक कवी हा संस्कृती आणि भाषेच्या वहनाचे कार्य करतो. मात्र, कोणत्याही कारणास्तव मराठी भाषा लादणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. नाशिकचे कवी राजू देसले यांच्या ‘अवघेचि उच्चार’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारक येथे या प्रकाशन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रंगनाथ पाठारे यांनी कवी राजू देसले यांनी लिहिलेल्या कविता या मराठी साहित्याला मिळालेल्या नवीन दमाच्या आणि  नव्या प्रकारातील कविता असून या कवितांच्या शब्दाशब्दात फटकारे असल्याचे सांगितले. त्यात शब्दांच्या पलिकडे जाण्याची असोशी असल्याचे सांगितले. अभिनेते किशोर कदम तथा सौमित्र यांनी कवी राजू देसले हे नाशिकचा चालताबोलता संदर्भ असल्याचे सांगितले. अभिनेते तथा लेखक दीपक करंजीकर यांनी ज्याच्या चिंतनात अखंड माणसं आहेत, अशा व्यक्तीकडून येणारी कविता  वेगळीच असते, अशी आशा व्यक्त केली. प्रवीण बांदेकर,मंगेश काळे,  गोविंद काजरेकर, सरबजीत गरचा यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर विश्वास समूहाचे प्रमुख विश्वास ठाकूर, प्रवीण  बांदेकर, मंगेश काळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश होळकर यांनी केले. 

मराठी लादणे चुकीचे अलिकडच्या काळात मराठी भाषेसंदर्भात राजकीय पक्षांकडून मराठी पाट्या लावण्यासंदर्भात आणि मराठी साहित्य विक्रीला ठेवण्यासाठी आंदोलने केली जातात. हे निव्वळ मूर्खपणाचे लक्षण असल्याचे सांगत मराठी पण सिध्द करायची गरज भासायला नको, हा व्यवसाय असून याप्रकारे मराठी भाषा लादणे चुकीचे ठरेल असे परखड मत रंगनाथ पठारे यांनी कुठल्याही राजकीय पक्षाचे नाव घेता मांडले. 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक