शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट रोडच्या तक्रारीला तब्बल दीड वर्षानंतर पीएमओचे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST

नाशिक : सरकारी काम, सहा महिने थांब, असे म्हटले जाते. मात्र, केंद्र सरकारच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ...

नाशिक : सरकारी काम, सहा महिने थांब, असे म्हटले जाते. मात्र, केंद्र सरकारच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील डिजिटल इंडिया म्हणजे वेगाने कामकाज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा नाशिकचे पारस लोहाडे यांना भलताच अनुभव आला आहे. मोदी यांच्या संकल्पनेतील स्मार्ट सिटी करताना नाशिकचा अत्यंत गाजलेल्या स्मार्ट रोडचे काम दीड वर्षापासून रखडले आहे अशी तक्रार करणाऱ्या लोहाडे यांना पंतप्रधानांच्या तक्रार निवारण कक्षाने आणखी दीड वर्षाने उत्तर पाठवले आहे. त्यात काम संपले, स्मार्ट रोड सुरू झाल्याने तक्रार बंद इतकेच माफक कळविले आहे.

म्हणजेच अर्धवट रस्त्याची तक्रार केल्यानंतर ते पूर्ण होऊ दिल्यानंतर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने वेळ घेतला असेल तर अजब तुझे सरकार म्हणण्याचीच वेळ आली आहे, अशी भावना तक्रारकर्त्या लोहाडे यांनी व्यक्त केली आहे.

स्मार्ट सिटी हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून नाशिक शहराचा त्यात चार वर्षांपूर्वी समावेश झाला. या प्रकल्पाअंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान अवघ्या १ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी तब्बल १७ कोटी रुपये खर्च आला. त्यातही रस्त्याचे काम तब्बल तीन वर्षे चालले. जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय आणि अन्य शासकीय कार्यालये, शाळा आणि बाजारपेठा असलेल्या या मार्गाचे काम रखडल्याने सर्वांचेच हाल झाले. सामाजिक कार्यकर्ते पारस लोहाडे यांचे अशोकस्तंभ येथे दुकान असून त्यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाल्याने त्यांनी त्रस्त होऊन अखेरीच पंतप्रधानांच्या तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार केली होती. कामाच्या संथगतीमुळे चार वेळा मुदतवाढ दिलेल्या या मार्गाचे काम पूर्ण होत नसल्याने अखेरीस आपण पंतप्रधान म्हणून लक्ष घालावे अशी तक्रार त्यांनी केली होती. १ जुलै २०१९ रोजी त्यांनी पंतप्रधानांच्या पोर्टलवर ही तक्रार त्यांनी केली. त्यानंतर त्याचे काहीच उत्तर आले नाही. गेल्या वर्षी या रस्त्याचे काम पूर्ण झाले. दरम्यान, या ठेकेदाराला कंपनीने प्रति दिन ३६ हजार रुपये दंड केला. तो नंतर बंद केला. या दंडाला ठेकेदार कंपनीने लवाद नियुक्त करून आव्हानदेखील दिले. त्यानंतर आता गुरुवारी (दि.२८) पंतप्रधान कार्यालयाने प्रत्युत्तर पाठवले असून आता रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग तुमच्यासाठी खुला झाला आहे. एवढे उत्तर देऊन तक्रार निकाली काढली आहे. त्यामुळे लाेहाडे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

कोट...

मोदी सरकारने मला वाढदिवसाच्या दिवशी प्रत्युत्तर देऊन अनोखी भेट दिली आहे. किमान उत्तर देताना रस्त्याचे काम कसे काय पूर्ण झाले आणि कंपनीने ठेकेदारावर कारवाई केली हे तरी नमूद करायला हवे होते. रस्ता सुरू झाला हे दिल्लीहून पंतप्रधान कार्यालयाने कळवण्याची गरज नव्हती. डिजिटल इंडियाचा कारभार इतका वेगाने होत असेल तर काँग्रेसच्या काळातील कागदावरील व्यवहार काय वाईट होता?

- पारस लोहाडे, तक्रारकर्ते, नाशिक

...

स्मार्ट रोडचा संग्रहीत फोटो वापरावा.