शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 15:49 IST

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून देवगाव त्र्यंबकेश्वर मार्गावरील बोरीचीवाडी येथे मुख्य रस्त्याला एक ते दीड फूट भगदाड पडले आहे. पावसाळयात डहाळेवाडी ते देवगाव या मुख्य रस्त्यावरील मार्गावर प्रचंड सकाळ संध्याकाळ धुके पसरलेले असल्याने या मार्गावरून मार्गक्र मण करतांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

ठळक मुद्देबोरीचीवाडी येथे रस्त्याला भगदाड : वाहनचालक त्रस्त

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून देवगाव त्र्यंबकेश्वर मार्गावरील बोरीचीवाडी येथे मुख्य रस्त्याला एक ते दीड फूट भगदाड पडले आहे. पावसाळयात डहाळेवाडी ते देवगाव या मुख्य रस्त्यावरील मार्गावर प्रचंड सकाळ संध्याकाळ धुके पसरलेले असल्याने या मार्गावरून मार्गक्र मण करतांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी वाहनांचा अंदाज न आल्याने किंवा रस्त्यातील खड्यांमुळे मोठया प्रमाणावर अपघात घडून येतात. तसेच पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश चाळण झाली असून वाहनचालकांची वाहन चालवताना त्रेधातिरपीट उडते.अनेकवेळा अपघात देखील झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता गायब होऊन फक्त खड्डेच दिसत असल्याने वाहनचालकांना खड्डे चुकविण्याऐवजी रस्ता शोधावा लागत असल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांसह प्रवाशी, वाहनचालक करत आहेत.त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचे माहेरघर असल्याने अतिपाऊसमुळे येथील रस्ते देखील वारंवार खराब होत असतात. सामुंडी ते कोजुली या पाच किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था खड्यांमुळे बिकट झाली असून वाहने खिळखिळी झाली आहेत. रोजचे नोकर- चाकर व्याधींनी ग्रस्थ झाले आहेत. तसेच देवगाव परिसरातील देवगाव-वावीहर्ष, देवगाव श्रीघाट, टाकेदेवगाव- येल्याचीमेट, टाकेदेवगाव- वावीहर्ष या मार्गांवरील रस्त्यांना मोठे खड्डे पडले असून दिशादर्शक फलक नादुरु स्त झाले आहेत. देवगाव फाट्यावरील त्रिफुली गेल्या सात ते आठ महिन्यांपासून नादुरु स्त आहे.पाच वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांचे काम करण्यात आले होते.आजया रस्त्यांची चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत. दुरावस्था झालेल्या रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवून मलमपट्टी केली जाते. मात्र, पावसाळ्यामध्ये या रस्त्यांची अवस्था जैसे थे राहते. सध्यस्थितीत रस्त्याची अवस्था नाजूक झाल्याने छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत, तर काहींना प्राणास मुकावे लागले. अनेकांना पाठीचे आजार उद्भवले आहेत.नाशिकहून खोडाळ्याला भाजीपाला ने आण करण्याचे काम असल्याने या मार्गावरून नेहमीच मार्गक्र मण असते. आव्हाटे ते देवगाव या सात किलोमीटर अंतरावर पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत प्रचंड धुके पसरलेले असते. त्यामुळे धुक्यातून मार्गक्र मण करणे अवघड होते. तशा परिस्थितीत खड्यातून आदळआपट करत मार्ग शोधावा लागतो.- पांडुरंग खादे, भाजीपाला वाहतूक पुरवठादार. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग