शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 15:49 IST

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून देवगाव त्र्यंबकेश्वर मार्गावरील बोरीचीवाडी येथे मुख्य रस्त्याला एक ते दीड फूट भगदाड पडले आहे. पावसाळयात डहाळेवाडी ते देवगाव या मुख्य रस्त्यावरील मार्गावर प्रचंड सकाळ संध्याकाळ धुके पसरलेले असल्याने या मार्गावरून मार्गक्र मण करतांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

ठळक मुद्देबोरीचीवाडी येथे रस्त्याला भगदाड : वाहनचालक त्रस्त

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून देवगाव त्र्यंबकेश्वर मार्गावरील बोरीचीवाडी येथे मुख्य रस्त्याला एक ते दीड फूट भगदाड पडले आहे. पावसाळयात डहाळेवाडी ते देवगाव या मुख्य रस्त्यावरील मार्गावर प्रचंड सकाळ संध्याकाळ धुके पसरलेले असल्याने या मार्गावरून मार्गक्र मण करतांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी वाहनांचा अंदाज न आल्याने किंवा रस्त्यातील खड्यांमुळे मोठया प्रमाणावर अपघात घडून येतात. तसेच पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश चाळण झाली असून वाहनचालकांची वाहन चालवताना त्रेधातिरपीट उडते.अनेकवेळा अपघात देखील झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता गायब होऊन फक्त खड्डेच दिसत असल्याने वाहनचालकांना खड्डे चुकविण्याऐवजी रस्ता शोधावा लागत असल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांसह प्रवाशी, वाहनचालक करत आहेत.त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचे माहेरघर असल्याने अतिपाऊसमुळे येथील रस्ते देखील वारंवार खराब होत असतात. सामुंडी ते कोजुली या पाच किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था खड्यांमुळे बिकट झाली असून वाहने खिळखिळी झाली आहेत. रोजचे नोकर- चाकर व्याधींनी ग्रस्थ झाले आहेत. तसेच देवगाव परिसरातील देवगाव-वावीहर्ष, देवगाव श्रीघाट, टाकेदेवगाव- येल्याचीमेट, टाकेदेवगाव- वावीहर्ष या मार्गांवरील रस्त्यांना मोठे खड्डे पडले असून दिशादर्शक फलक नादुरु स्त झाले आहेत. देवगाव फाट्यावरील त्रिफुली गेल्या सात ते आठ महिन्यांपासून नादुरु स्त आहे.पाच वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांचे काम करण्यात आले होते.आजया रस्त्यांची चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत. दुरावस्था झालेल्या रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवून मलमपट्टी केली जाते. मात्र, पावसाळ्यामध्ये या रस्त्यांची अवस्था जैसे थे राहते. सध्यस्थितीत रस्त्याची अवस्था नाजूक झाल्याने छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत, तर काहींना प्राणास मुकावे लागले. अनेकांना पाठीचे आजार उद्भवले आहेत.नाशिकहून खोडाळ्याला भाजीपाला ने आण करण्याचे काम असल्याने या मार्गावरून नेहमीच मार्गक्र मण असते. आव्हाटे ते देवगाव या सात किलोमीटर अंतरावर पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत प्रचंड धुके पसरलेले असते. त्यामुळे धुक्यातून मार्गक्र मण करणे अवघड होते. तशा परिस्थितीत खड्यातून आदळआपट करत मार्ग शोधावा लागतो.- पांडुरंग खादे, भाजीपाला वाहतूक पुरवठादार. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग