शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दिंडोरीत मराठा क्रांती मोर्चाची नियोजन बैठक

By admin | Updated: July 10, 2017 00:12 IST

दिंडोरी : ९ आॅगस्टला मुंबई येथे मराठा क्र ांती मोर्चा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : ९ आॅगस्टला मुंबई येथे मराठा क्र ांती मोर्चा होणार असून, या मोर्चाच्या तयारीसाठी दिंडोरी तालुक्यातून रणशिंग फुंकण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबईतच ठिय्या देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गनिमी काव्याने या मूक मोर्चाद्वारे सरकारला अंतिम इशारा देण्याचा इरादा सकल मराठा समाजाने व्यक्त केला.दिंडोरी येथील कै. पोपटराव जाधव संकुल येथे सकल मराठा क्र ांती मोर्चाची मुंबई येथे होणाऱ्या मोर्चासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. बैठकीस आमदार सीमा हिरे, छावाचे करण गायकर, गणेश कदम, चंद्रकांत बनकर, तुषार जगताप, योगेश नाटकर, डॉ. अमोल वाजे, योगेश निसाळ आदींनी मार्गदर्शन करत मुंबई मोर्चाबाबत नियोजन केले.नाशिक येथे झालेल्या मोर्चात दिंडोरी तालुक्याची महत्त्वाची भूमिका राहिली होती. आता मुंबई मोर्चातही दिंडोरी तालुक्यातून सर्वाधिक समाजबांधव मोर्चात सहभागी होतील, अशी ग्वाही देण्यात आली. दिंडोरी तालुक्याच्या प्रत्येक गावात मोर्चाच्या नियोजनाच्या बैठका घेण्यात येणार असून, हा मोर्चा मराठा समाजाच्या मागण्यांसाठी असणार आहे. या आंदोलनात पक्षभेद विसरून सर्व समाजाने एकत्रित यावे. मोर्चा आदर्शवत व्हावा यासाठी सर्व समाजबांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.बैठकीचे नियोजन सोमनाथ जाधव, रवि जाधव, गंगाधर निखाडे, कवी संदीप जगताप, सुजित मुरकुटे, रावसाहेब बोरस्ते, मनोज ढिकले, नितीन देशमुख, प्रशांत मोगल, विलास लोखंडे, संतोष आंबेकर, रमेश बोरस्ते, ऋषिकेश पडोळ, गोविंद मालसाने, संतोष मुरकुटे, माधव पाचोरकर, योगेश बर्डे, नीलेश पेलमहाले, वाल्मीक मोगल आदींनी केले होते. बैठकीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .