शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नांदूरशिंगोटे-लोणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:52 IST

नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यात माल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्यावर पुन्हा एकदा खडडयाचे साम्राज्य पसरले आहे. आठ महिन्यात दोन वेळेस रस्त्याची दुरूस्ती करुनही दुरावस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रस्त्यावरील ज्या खड्डयाचे डांबरीकरण करण्यात आले होते ते खड्डे पुन्हा उखडले आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थे’ च झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक - पुणे महामार्गाला जोडलेला नांदूरशिंगोटे ते लोणी हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्ता सर्वाधिक खराब झाला होता. नांदूरशिंगोटे पासून जिल्हाहद्दीपर्यंत सुमारे अडीच किलोमीटर अंतरात प्रंचड खड्डे पडले होते. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.नाशिक - पुणे रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यापासून नांदूरशिंगोटे लोणी रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. आमदार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नर तालुक्यातील ज्या रस्त्यांची दुरावस्था झाली होती, त्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करून देखभाल दुुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. डिसेंबर २०१७ मध्ये रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरुवात केली होती. जागोजागी खड्डे भरतांना व्यवस्थित पध्दतीने भरण्यात आलेले नाही, ओबडधोबड कामे, रस्त्याची वरचेवर मलमपट्टी करून थातूरमातूर खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. या रस्त्याने वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. अडीच किलोमीटरच्या अंतरावर काही ठिकाणी अर्धवट साइडपट्टया ठेवण्यात आल्या आहेत. ज्या खड्डयांचे डांबरीकरण करण्यात आले आहे ते पुन्हा आठ महिन्यांत उखडण्यास प्रारंभ झाला आहे. नांदूरशिंगोटे ते लोणी मार्गावरील रस्त्यांना पुन्हा खड्डे पडले असल्याने वाहनचालक व प्रवाशांना याचा त्रास अवघ्या आठ महिन्यात सोसावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असताना लक्ष न दिल्याने रस्त्याची पुन्हा दुरावस्था झाली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा