शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

जिल्ह्यातील ‘पिंक व्हिलेज’ पुन्हा चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्याच्या डोंगर कपारीत वसलेले भिंतघर हे गाव तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ...

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्याच्या डोंगर कपारीत वसलेले भिंतघर हे गाव तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. महिला सक्षमीकरण आणि कन्या सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी संपूर्ण गाव गुलाबी रंगाने रंगले आणि तेव्हापासून पिंक व्हिलेज म्हणजेच गुलाबी गाव नावारूपास आले. एका प्राथमिक शिक्षकाच्या प्रयत्नातून हे गाव जगाच्या नकाशावर झळकले. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे या गावाला भेट देणार असल्याने प्रशासकीय यंत्रणांची धावपळ वाढली असून, लोकप्रतिनिधीही या गावाला भेट देत आहेत.

गुलाबी रंग हा महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून मानला जातो. हा संदेश देण्यासाठी गावातील तत्कालीन शिक्षक जितेंद्र गवळी यांनी गुलाबी गावाची संकल्पना गावकऱ्यांना सांगितली आणि अख्खे गाव त्यांच्या विचाराशी सहमत झाले. यासाठी गावाने लोकवर्गणी गोळा केली आणि ८० ते १०० घरांचे अवघे गाव गुलाबी रंगात रंगून गेले. प्रत्येक घराला गुलाबी रंग देण्यात आला. गावातील रस्ते स्वच्छ झाले. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येकाचे आंगण स्वच्छ झाले. झाडाझुडपांना लाकडाच्या जाळ्यांचे संरक्षण देण्यात आले. श्रमदानातून गावाचा कायापालट करण्यात आला. येथील शाळा, अंगणवाड्यादेखील गुलाबी रंगाने रंगलेल्या आहेत.

महिला आणि मुलींचा सन्मान करणाऱ्या या गावाची महती जिल्ह्यात आणि नंतर राज्यातही पोहोचली आणि पर्यटकांची पावले या गावाकडे वळली. गावातील आदिवासी संस्कृतीचे दर्शन येथे घडते. आदिवासी साहित्यांचे प्रदर्शन गावात पाहायला मिळते. परदेशातूनही अनेक लोक हे गाव पाहाण्यासाठी आले. आता या गावाला राज्यपाल भेट देणार आहेत. येत्या ३ तारखेला नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यपाल या गावात आदिवासींचा पाहुणचार घेणार आहेत.

--इन्फो--

इरमाळ, भिंतघर ते गुलाबी गाव

पूर्वी या गावाला ‘इरमाळ’ या नावाने ओळखले जायचे. पूर्वी या गावात येथील सर्व आदिवासी अशिक्षित होते. कुडाच्या व बांबूपासून बनविलेल्या भिंतीच्या घरात ते राहायचे. कालांतराने इरमाळ गावात वाघमारे कुळाचे एक जहागीरदार होऊन गेले. त्यांनी त्या काळी तिथे भव्य असे दगडाच्या भिंतीचे एक मोठे घर बांधलेले होते. त्या दगडाच्या भिंतींनी बांधलेल्या घरावरून या गावाची ओळख ‘भिंतघर’ म्हणून पडली आणि इरमाळ नावाचे हे गाव ‘भिंतघर’ म्हणून आजपावेतो ओळखले जाऊ लागले. कागदोपत्री जरी या गावाचे नाव भिंतघर झालेले असेल, तरी जुनीजाणती माणसे या गावाला इरमाळ म्हणूनच ओळखतात, तर अख्खा महाराष्ट्र या गावाला गुलाबी गाव म्हणून ओळखते.