शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

जिल्ह्यातील ‘पिंक व्हिलेज’ पुन्हा चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्याच्या डोंगर कपारीत वसलेले भिंतघर हे गाव तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ...

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्याच्या डोंगर कपारीत वसलेले भिंतघर हे गाव तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. महिला सक्षमीकरण आणि कन्या सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी संपूर्ण गाव गुलाबी रंगाने रंगले आणि तेव्हापासून पिंक व्हिलेज म्हणजेच गुलाबी गाव नावारूपास आले. एका प्राथमिक शिक्षकाच्या प्रयत्नातून हे गाव जगाच्या नकाशावर झळकले. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे या गावाला भेट देणार असल्याने प्रशासकीय यंत्रणांची धावपळ वाढली असून, लोकप्रतिनिधीही या गावाला भेट देत आहेत.

गुलाबी रंग हा महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून मानला जातो. हा संदेश देण्यासाठी गावातील तत्कालीन शिक्षक जितेंद्र गवळी यांनी गुलाबी गावाची संकल्पना गावकऱ्यांना सांगितली आणि अख्खे गाव त्यांच्या विचाराशी सहमत झाले. यासाठी गावाने लोकवर्गणी गोळा केली आणि ८० ते १०० घरांचे अवघे गाव गुलाबी रंगात रंगून गेले. प्रत्येक घराला गुलाबी रंग देण्यात आला. गावातील रस्ते स्वच्छ झाले. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येकाचे आंगण स्वच्छ झाले. झाडाझुडपांना लाकडाच्या जाळ्यांचे संरक्षण देण्यात आले. श्रमदानातून गावाचा कायापालट करण्यात आला. येथील शाळा, अंगणवाड्यादेखील गुलाबी रंगाने रंगलेल्या आहेत.

महिला आणि मुलींचा सन्मान करणाऱ्या या गावाची महती जिल्ह्यात आणि नंतर राज्यातही पोहोचली आणि पर्यटकांची पावले या गावाकडे वळली. गावातील आदिवासी संस्कृतीचे दर्शन येथे घडते. आदिवासी साहित्यांचे प्रदर्शन गावात पाहायला मिळते. परदेशातूनही अनेक लोक हे गाव पाहाण्यासाठी आले. आता या गावाला राज्यपाल भेट देणार आहेत. येत्या ३ तारखेला नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यपाल या गावात आदिवासींचा पाहुणचार घेणार आहेत.

--इन्फो--

इरमाळ, भिंतघर ते गुलाबी गाव

पूर्वी या गावाला ‘इरमाळ’ या नावाने ओळखले जायचे. पूर्वी या गावात येथील सर्व आदिवासी अशिक्षित होते. कुडाच्या व बांबूपासून बनविलेल्या भिंतीच्या घरात ते राहायचे. कालांतराने इरमाळ गावात वाघमारे कुळाचे एक जहागीरदार होऊन गेले. त्यांनी त्या काळी तिथे भव्य असे दगडाच्या भिंतीचे एक मोठे घर बांधलेले होते. त्या दगडाच्या भिंतींनी बांधलेल्या घरावरून या गावाची ओळख ‘भिंतघर’ म्हणून पडली आणि इरमाळ नावाचे हे गाव ‘भिंतघर’ म्हणून आजपावेतो ओळखले जाऊ लागले. कागदोपत्री जरी या गावाचे नाव भिंतघर झालेले असेल, तरी जुनीजाणती माणसे या गावाला इरमाळ म्हणूनच ओळखतात, तर अख्खा महाराष्ट्र या गावाला गुलाबी गाव म्हणून ओळखते.