शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी थंडीची चाहूल

By admin | Updated: October 30, 2015 23:59 IST

तपमान घसरले : सकाळी व सायंकाळी जाणवतोय गारवा

नाशिक : दोन दिवसांपासून शहराच्या किमान तपमानात सुमारे सहा अंशांनी घट झाली असून, सकाळी व सायंकाळी गारवा जाणवत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर थंडीची चाहूल लागली असून, दिवसेंदिवस थंडीत वाढ होणार असल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले. नवरात्रोत्सवानंतर ‘आॅक्टोबर हीट’ची तीव्रता कमी होऊन हळूहळू थंडीची चाहूल लागते. विशेषत: दिवाळी आणि थंडीचे अतूट नाते आहे. दिवाळीतील पहाटेचे अभ्यंगस्नान गुलाबी थंडीच्या साक्षीनेच केले जाते. यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने थंडीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती; मात्र नाशिककरांना दिवाळीपूर्वी थंडीची चाहूल लागली आहे. दोन दिवसांपासून पहाटे व रात्री वातावरणात चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. २६ आॅक्टोबर रोजी शहराचे कमाल तपमान २९.३, तर किमान तपमान २०.३ अंश सेल्सिअस होते, शुक्रवारी कमाल तपमान साधारणत: तेवढेच (३० अंश सेल्सिअस) असले, तरी किमान तपमान मात्र सुमारे ६ अंशांनी घसरून १४.९ अंश इतके नोंदवले गेले. कमाल तपमान घटल्याने थंडीने आपल्या आगमनाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे रात्री व पहाटे नागरिक ऊबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत. कानटोप्या, कानपट्ट्यांच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, नैऋत्य अरबी समुद्रावर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वातावरण ढगाळ झाल्यास थंडीच्या तीव्रतेवर परिणाम होतो. यंदा तसे न घडल्यास दिवसेंदिवस थंडीच्या प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)