शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

पावसाअभावी बळीराजा हवालदिल

By admin | Updated: July 4, 2014 00:17 IST

पावसाअभावी बळीराजा हवालदिल

 

घोटी : पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात तीन महत्त्वाची नक्षत्रे उलटूनही पावसाने आगमन न केल्याने लागवडीसाठी पेरणी केलेली भाताची रोपे जळण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. कधी एकदा पाऊस बरसेल आणि कधी भाताची लागवड होईल या विचाराने तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, पाऊस लांबणीवर पडल्याने तालुक्यात पाणीटंचाईची समस्या वाढली असून, पिण्याच्या पाण्याचे स्रोत असणाऱ्या विहिरी, नद्या-नाले आटल्याने कोरडेठाक पडले आहेत, तर सर्व प्रमुख धरणांनी तळ गाठला असल्याचे भयाण चित्र इगतपुरी तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.सुरुवातीच्या काळात झालेल्या वादळी पावसाच्या पाण्यावर तालुक्यात शेतकऱ्यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीकडे दुर्लक्ष करीत याच पाण्याच्या भरवशावर भाताच्या पेरण्या केल्या होत्या. आता दमदार पाऊस होईल या अपेक्षेवर जमिनीच्या पोटात टाकलेले धान्य काही दिवसातच कोम धरून वर आले; परंतु त्यानंतर मात्र पावसाने सर्वत्र पाठ फिरविली. हळूहळू पाण्याअभावी या रोपाची वाढ खुंटली आणि उन्हाच्या तडाख्याने ही पिके जळू लागली. काही शेतकऱ्यांनी मात्र ही रोपे वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करीत जवळील धरण, नदी-नाले, विहिरी यांचे पाणी भरले; परंतु कालांतराने पाण्याचे हे स्रोत आटू लागले. यावरही मात करीत काही शेतकऱ्यांनी पाण्याच्या टॅँकरने ही रोपे वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.मागील वर्षी १५ जूनपर्यंत सर्वत्र भात लावणी पूर्ण झाली होती. यावर्षी जून उलटून गेला तरी पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्याचे डोळे पाणावले आहेत. तालुक्यातील विहिरी, धरणे, नद्या यांनीदेखील तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करूनही पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जनावरांना चाराही नाही, अशा परिस्थितीत करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईने गंभीर रूप धारण करीत अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला असताना मात्र इगतपुरी पंचायत समिती याकडे दुर्लक्ष आणि काणाडोळा करीत असल्याने अनेक गावांतील महिला पाणी कुठून मिळवावे या विवंचनेत आहेत. याबाबत स्थानिक ग्रामसेवकाकडे कैफियत मांडल्यानंतर ग्रामसेवकही दुर्लक्ष करीत आहेत. (वार्ताहर)