शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

पिकअप जीप-आयशर टेम्पो अपघातात तीन ठार

By admin | Updated: November 22, 2015 23:34 IST

सिन्नर-शिर्डी रस्ता : वावी-पांगरी दरम्यानची दुर्घटना

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पिकअप जीप व आयशर टेम्पो यांची धडक होऊन झालेल्या अपघातात ठाणे जिल्ह्यातील तीन जण ठार झाले, तर आठ जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. वावी-पांगरी गावांदरम्यान शिंदे वस्तीजवळ शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सदर अपघात झाला. कोशिंबी, ता. भिवंडी (जि. ठाणे) येथील काही कुटुंबीय देवदर्शनासाठी पिकअप जीपने (क्र. एमएच ०४ जीआर ९१२२) घेऊन शिर्डीच्या दिशेने निघाले होते. समोरून येणारा डाक पार्सलचा आयशर टेम्पो (क्र. एमएच २०, एटी ८६३४) यांच्यात धडक झाली. पिकअप जीपमध्ये १७-१८ प्रवासी असल्याने व गटारीत उलटल्याने अंधारात जखमी महिला व लहान मुले यांचे रडणे व किंकाळ्यांमुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. अपघातात ज्ञानेश्वर नामदेव ठाकरे (३०), नेहा ज्ञानेश्वर ठाकरे (२७) दोघेही रा. कोशिंबी, ता. भिवंडी या दांपत्यासह योगिता संतोष चौधरी (२५), रा. आडगाव, ता. शहापूर हे ठार झाले, तर अनिल बबन पालवी, अंजना पालवी, राम गणपत सपाट, ज्ञानेश्वर कान्हू शिंदे, उमेश परशुराम ठाकरे, गणेश विष्णू चौधरी, अजय राम सपाट हे जखमी झाले. जखमींवर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अन्य एक गंभीर जखमी असून, त्यास नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी घटनेची माहिती वावी पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह हवालदार शिवाजी माळी, संदीप शिंदे, दिलीप जोंधळे, हनुमंत कांबळे, रामदास धुमाळ, रमेश सदगीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ किरण पाटील, इकबाल अत्तार, संतोष घोटेकर, राहुल पठाडे, मयूर कापुरे यांच्या मदतीने जखमींना खासगी रुग्णालयात नेण्यात आले.(वार्ताहर)