शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाडीवºहे गावालगत बिबटयाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 17:59 IST

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे गावालगत बिबटयाचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. बिबट्या अजूनही त्याच ठिकाणी असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.

ठळक मुद्दे वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे गावालगत बिबटयाचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. बिबट्या अजूनही त्याच ठिकाणी असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.गोंदे दुमाला, मुकणे व वाडीवºहे शिवहद्दीत बिबटयांचा वावर नेहमीचाच झाला असून धरण क्षेत्र, ऊस व जंगल यामुळे वन्य प्राण्याबरोबर बिबट्यांचे भक्षासाठी गावाकडे व वस्तीच्या ठिकाणी फिरणे वर्षभरापासून नेहमीचे झाले आहे. त्यातच सोमवारी पहाटेच्यावेळी एक बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकल्याची घटना ताजी असतांनाच बुधवारी (दि.३०) सकाळी ९ वाजे दरम्यान मुकणे धरणाच्या दिशेने एक बिबट्या येतांना शेतावर जाणाºया काही महिलांनी पाहिला असता त्यांचीही काहीवेळ भंबेरीच उडाली. धरणाच्या दिशेने आलेला बिबट्या गावाजवळच वाडीवºहे-मुरंबी रस्त्यावर रामदास शेजवळ यांच्या शेतात घुसल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. या ठिकाणी भवानी देवीचे मंदिर असल्याने सर्वांचाच सतत वावर असतो त्यामुळे वनवीभागाने पिंजरा लावावा अशी मागणी नागरिक करित होते.दरम्यान सदर घटनेबाबत ग्रामस्थांनी इगतपुरी वनविभागाला कळविले असता वनविभागाच्या महिला वनरक्षक शालिनी पवार, पी. जी. साबळे यानी बिबट्या असणाºया ठिकाणी भेट देऊन खात्री करण्यासाठी थांबुन राहिल्या मात्र गवताच्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्या भरपूर वेळ झाला तरी शेताबाहेर येत नव्हता.  दरम्यान सोमवारी पहाटे गोंदेदुमाला येथील शिवारात बिबट्या वनविभागाच्या पिंजºयात अडकल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असतांनाच, पुन्हा जवळच दुसरा बिबट्या शेतात घुसल्याने ग्रामस्थ अद्यापही भीतीच्या छायेत असुन अजूनही बिबटे मुकणे, गोंदेदुमाला, वाडीवºहे या गावच्या शिवहद्दीत असल्याने अनेकदा मागणी करूनही वनविभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने या परिसरातील बिबट्यांचा वावर वाढला आहे. सदर ठिकाणासह या परिसरातील बिबटे असणाºया ठिकाणी वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.