शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पेठच्या ‘त्या’ बालगृहातील मुलींचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 15:54 IST

नाशिक : गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या पेठ येथील बालसदन गृहातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर तेथे राहणाºया अन्य मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करून महिला व बाल कल्याण विभागाने बालसदन गृहातील ५८ मुलींचे नाशकात स्थलांतर केले आहे. या मुलींना नाशिकमधील शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवून देण्यात आला असून, आधाराश्रम व रिमांड होम येथे त्यांची ...

नाशिक : गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या पेठ येथील बालसदन गृहातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर तेथे राहणाºया अन्य मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करून महिला व बाल कल्याण विभागाने बालसदन गृहातील ५८ मुलींचे नाशकात स्थलांतर केले आहे. या मुलींना नाशिकमधील शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवून देण्यात आला असून, आधाराश्रम व रिमांड होम येथे त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.पेठ येथे महिला हक्क संरक्षण समिती संचलित अनाथ मुलींचे बालगृह चालविले जात होते. सुशीला अलबाड ह्या त्या संस्थेच्या अध्यक्ष असून, त्यांच्या मुलाने या बालसदनात राहणाºया एका अल्पवयीन मुलीवर २०१५ पासून सातत्याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. सदर मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिची रवानगी नाशिकच्या वात्सल्य आधाराश्रमात करण्यात आल्यावर तिने आपल्यावर गुदरलेला प्रसंग तेथील रेक्टरच्या कानी घातल्यानंतर या प्रकरणाला वाच्यता फुटली होती. या प्रकरणी १२ जुलै रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन अलबाड यांच्या मुलाला अटक करण्यात आली. त्याचबरोबर त्याच्या या कृत्याला फूस दिल्याप्रकरणी सुशीला अलबाड यांनाही सहआरोपी करण्यात आले. पेठच्या बालगृहात अनाथ मुलींच्या शिक्षणाची व राहण्याची व्यवस्था असल्याने सहा ते अठरा वयोगटाच्या जवळपास ५८ मुलींचे याठिकाणी वास्तव्य होते. संस्थाचालकाकडूनच लैंगिक छळ होत असल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत महिला व बालकल्याण विभागाने या बालगृहाला भेट देऊन तेथे राहणाºया अन्य मुलींचे जाबजबाब नोंदवून घेण्याबरोबरच त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली होती. या मुलींचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या हेतूने शासनाने त्यांची सुरक्षित ठिकाणी रवानगी करण्याचा निर्णय घेऊन ५८ मुलींना नाशकात हलविले. जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सुरेखा पाटील यांनी या सर्व मुलींची वयोगटाच्या हिशेबाने आधारश्रम तसेच उंटवाडीच्या रिमांड होममध्ये व्यवस्था केली असून, त्यांना नजीकच्या शाळेत प्रवेशही मिळवून दिला आहे. पेठच्या ‘त्या’ बालगृहाची मान्यताही रद्द करण्यात आली आहे.