शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लग्न सोहळ्याला दिलेली परवानगी अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:15 IST

नाशिक: मंगल कार्यालयांमध्ये किमान ५० लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करण्यास पोलीस आयुक्तांनी दिलेली परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी ...

नाशिक: मंगल कार्यालयांमध्ये किमान ५० लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करण्यास पोलीस आयुक्तांनी दिलेली परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या दोन दिवसात रद्द ठरवत यापूर्वी असलेला मनाई आदेश कायम राहाणार असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉन्स तसेच मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळ्यास परवानगी नाकारण्याचा निर्णय मागील महिन्यात आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. असे असतांनाही ५ एप्रिल रोजी पोलीस आयुक्तांनी मंगल कार्यालयांमध्ये ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी असल्याचे तसेच त्यासाठी पेालीस परवानगी आवश्यक असल्याचे आदेश काढले होते. या आदेशामुळे काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. शहारत कोरेानाने थैमान घातलेले असताना तसेच जमावबंदी आदेश लागू असताना पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मंगल कार्यालयांमधून लग्न सोहळ्याला परवानगी देण्यात आल्याबाबत अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली तसेच काहीं पूरक व्यावसायिकांनी देखील परवानगीची मागणी केल्याने काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

मंगल कार्यालये, लॉन चालकांना पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र्यरीत्या दिलेली परवानगी अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मागे घेत यापूर्वी म्हणजेच मार्च १५ मध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार लग्न सोहळ्यावरील निर्बंध कायम राहाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सहाजिकच पोलीस आयुक्तांनी काढलेले आदेश रद्द ठरले आहेत.

कोरोनाचा सर्वाधिक प्रसार हा लग्न सोहळ्यातून होत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढल्यानंतर लग्नसोहळ्यांवर जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध घातले होते. त्यानंतरही लग्नसेाहळ्यासाठी गर्दी वाढतच असल्याने अखेर लॉन्स आणि मंगल कार्यालयामधील सोहळ्याला पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. असे असतांनाही पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र्यरीत्या आदेश काढून मंगल कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीत लग्नसोहळ्याला परवानगी दिल्याने प्रशासकीय यंत्रणेतील गेांधळ समोर आला होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी विवाह सोहळ्यांना असलेली बंदी कायम असल्याचे सांगत प्राधिकरणाच्या बैठकीत यापूर्वी झालेला निर्णय कायम असल्याचे म्हटले आहे.