शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

विरोधकांच्या गोंधळातच ‘स्थायी’च्या नियुक्त्या

By admin | Updated: March 31, 2017 00:45 IST

नाशिक : महापालिका स्थायी समितीवर राजकीय पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार १६ सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया विरोधकांनी घातलेल्या गोंधळातच महापौर रंजना भानसी यांनी पार पाडली.

 नाशिक : महापालिका स्थायी समितीवर राजकीय पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार १६ सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया विरोधकांनी घातलेल्या गोंधळातच महापौर रंजना भानसी यांनी पार पाडली. स्थायी समितीवर भाजपाचे ९, शिवसेनेचे ४ तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांचा प्रत्येकी एक सदस्य नियुक्त करण्यात आला. त्यामुळे स्थायी समितीही भाजपाच्या ताब्यात असणार आहे. दरम्यान, शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याने विरोधकांकडून वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न झाला, परंतु महापौरांनी त्यास दाद न देता नियुक्तीप्रक्रिया पूर्ण केली. महापालिका स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया सुरू होण्यापूर्वी महापौरांनी विभागीय आयुक्तांकडून आलेल्या गटनोंदणीच्या पत्रांनुसार गटनेत्यांची निवड जाहीर केली. त्यात शिवसेनेचे विलास शिंदे, भाजपाचे संभाजी मोरुस्कर, कॉँग्रेसचे शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार आणि मनसेचे सलीम शेख यांची गटनेतापदी निवड करण्यात आली. तत्पूर्वी, कॉँग्रेस वगळता अन्य सर्व पक्षांनी आपल्या सदस्यांच्या नियुक्तीसंबंधीचे पत्र नगरसचिवांकडे सुपूर्द केले होते. त्यामुळे पत्र देण्यासाठी कॉँग्रेसला दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला. पुन्हा सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कॉँग्रेसचे शाहू खैरे यांनी आपली आताच गटनेतापदी निवड झाली असल्याने चर्चा करण्यासाठी अर्धा तासाची मुदत मागितली. त्यानुसार, महापौरांनी आणखी दहा मिनिटांचा अवधी देत तोपर्यंत महासभा तहकूब केली. दहा मिनिटांनंतर पुन्हा सभेचे कामकाज सुरू झाले असता राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनी रिपाइंच्या एकमेव सदस्या दीक्षा लोंढे यांचा कोणाच्या गटात समावेश केला आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांची स्वतंत्र नोंदणी झाली असेल तर रिपाइंच्या गटनेतापदी निवड करण्याची सूचना केली. परंतु, नगरसचिव ए. पी. वाघ यांनी महसूल आयुक्तांकडून आलेल्या पत्रानुसारच गटनेत्यांची निवड केली असल्याचा खुलासा केला.