शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

मिरचीच्या झाडांचा जळाला शेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 01:23 IST

नाशिक : सातत्याने पडणाºया तीव्र थंडीचा विविध पिकांवर परिणाम जाणवू लागला असून, शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द गावातील अनेक शेतकºयांच्या निर्यातक्षम मिरची पिकाचे तीव्र थंडीमुळे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देथंडीचा परिणाम : सारोळे खुर्द परिसरातील शेतकऱ्यांना फटका; खुडणीचा खर्च वाढला

संजय दुनबळे।नाशिक : सातत्याने पडणाºया तीव्र थंडीचा विविध पिकांवर परिणाम जाणवू लागला असून, शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द गावातील अनेक शेतकºयांच्या निर्यातक्षम मिरची पिकाचे तीव्र थंडीमुळे नुकसान झाले आहे.सारोळे खुर्द परिसरात मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. येथील अनेक शेतकºयांनी निर्यातक्षम मिरची पिकाची लागवड केली आहे. मागील दहा ते बारा दिवस सातत्याने पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम मिरची पिकाला फटका बसला आहे. अतिथंडीमुळे मिरचीच्या झाडांचे शेंडे जळून गेले आहेत. याचा झाडाला लागलेल्या मिरच्यांना फटका बसला आहे. मिरची काळी पडणे, पोषण कमी होणे असे प्रकार घडू लागल्याचे सारोळे खुर्द येथील ऋषिकेश जेऊघाले, प्रकाश जेऊघाले, विश्वनाथ डुकरे आदी शेतकºयांनी सांगितले.जून महिन्यात लागवड केलेल्या नंदिता वाणाच्या लवंगी मिरचीचे सुमारे आठ ते ९ महिने उत्पादन मिळत असते. यातील बहुतेक मालाची निर्यात होते किंवा देशांतर्गत विविध बाजारपेठांमध्ये विक्री होत असते. लवंगी मिरचीच्या पिकापासून शेतकºयांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असते. यावर्षी मागील दहा-बारा दिवस पडलेल्या तीव्र थंडीचा फटका या पिकाला बसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.तीव्र थंडीमुळे मिरचीच्या शेतातील काही झाडांचे शेंडे जळून गेले आहेत. झाडाचा शेंडा जळाल्यानंतर त्याची वाढ खुंटते. बºयाचवेळा झाडाला फळ येण्याचे प्रमाण कमी होते. शेंडा जळालेले झाड वाचवण्यासाठी शेतकºयांना शेंडा खुडणीचा खर्च करावा लागतो. खुडणी झालेल्या झाडाला पुन्हा नव्याने शेंडे येणे आवश्यक असते अन्यथा मोठे नुकसान होते असे ऋषिकेश जेऊघाले यांनी सांगितले.शेंडा जळालेल्या झाडाला आलेल्या मिरच्यांचा रंग काळा पडू लागतो. किंवा त्यांची पूर्ण क्षमतेने वाढ होत नाही. निर्यातदार असा माल नाकारतात. निर्यातीसाठी पूर्णपणे हिरवी आणि सरळ वाढलेली मिरची आवश्यक असते. अन्यथा या मालाला उठाव राहात नाही. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होते, असे विश्वनाथ डुकरे यांनी सांगितले.सारोळे गावातील ७५ ते ८० टक्के शेतकºयांचे तीव्र थंडीमुळे मिरची पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज या शेतकºयांनी व्यक्त केला. प्रकाश जेऊघाले यांनी दोन एकरात मिरचीची लागवड केली असून, या पिकापासून त्यांना चार ते पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.थंडीचा परिणाम झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तूर्तास तरी या परिसरातील शेतकºयांनी शेंडा खुडणीची कामे सुरू केली आहेत. फळबागांनाही काही प्रमाणात फटकाथंडीचा फळबागांनाही काही प्रमाणात फटका बसला असून, शेतकºयांचे नुकसान झाले आहे. खडक माळेगाव येथील विकास रायते यांच्या पेरूच्या बागेचे थंडीमुळे नुकसान झाले आहे. ऐन फळधारणेच्या वेळेत थंडी पडली. त्यामुळे झाडांवर मोठ्या प्रमाणात दव साचले. त्यात थंडीची तीव्रता वाढल्याने झाडांची नवीन पाने जळून गेली. याचा फळ धारणेवर परिणाम झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. द्राक्षाला पर्याय म्हणून शेतकरी फळबागांकडे वळत असले तरी फळबागांनाही लहरी निसर्गाचा मार सहन करावा लागत आहे.