शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीच्या झाडांचा जळाला शेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 01:23 IST

नाशिक : सातत्याने पडणाºया तीव्र थंडीचा विविध पिकांवर परिणाम जाणवू लागला असून, शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द गावातील अनेक शेतकºयांच्या निर्यातक्षम मिरची पिकाचे तीव्र थंडीमुळे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देथंडीचा परिणाम : सारोळे खुर्द परिसरातील शेतकऱ्यांना फटका; खुडणीचा खर्च वाढला

संजय दुनबळे।नाशिक : सातत्याने पडणाºया तीव्र थंडीचा विविध पिकांवर परिणाम जाणवू लागला असून, शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द गावातील अनेक शेतकºयांच्या निर्यातक्षम मिरची पिकाचे तीव्र थंडीमुळे नुकसान झाले आहे.सारोळे खुर्द परिसरात मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. येथील अनेक शेतकºयांनी निर्यातक्षम मिरची पिकाची लागवड केली आहे. मागील दहा ते बारा दिवस सातत्याने पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम मिरची पिकाला फटका बसला आहे. अतिथंडीमुळे मिरचीच्या झाडांचे शेंडे जळून गेले आहेत. याचा झाडाला लागलेल्या मिरच्यांना फटका बसला आहे. मिरची काळी पडणे, पोषण कमी होणे असे प्रकार घडू लागल्याचे सारोळे खुर्द येथील ऋषिकेश जेऊघाले, प्रकाश जेऊघाले, विश्वनाथ डुकरे आदी शेतकºयांनी सांगितले.जून महिन्यात लागवड केलेल्या नंदिता वाणाच्या लवंगी मिरचीचे सुमारे आठ ते ९ महिने उत्पादन मिळत असते. यातील बहुतेक मालाची निर्यात होते किंवा देशांतर्गत विविध बाजारपेठांमध्ये विक्री होत असते. लवंगी मिरचीच्या पिकापासून शेतकºयांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असते. यावर्षी मागील दहा-बारा दिवस पडलेल्या तीव्र थंडीचा फटका या पिकाला बसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.तीव्र थंडीमुळे मिरचीच्या शेतातील काही झाडांचे शेंडे जळून गेले आहेत. झाडाचा शेंडा जळाल्यानंतर त्याची वाढ खुंटते. बºयाचवेळा झाडाला फळ येण्याचे प्रमाण कमी होते. शेंडा जळालेले झाड वाचवण्यासाठी शेतकºयांना शेंडा खुडणीचा खर्च करावा लागतो. खुडणी झालेल्या झाडाला पुन्हा नव्याने शेंडे येणे आवश्यक असते अन्यथा मोठे नुकसान होते असे ऋषिकेश जेऊघाले यांनी सांगितले.शेंडा जळालेल्या झाडाला आलेल्या मिरच्यांचा रंग काळा पडू लागतो. किंवा त्यांची पूर्ण क्षमतेने वाढ होत नाही. निर्यातदार असा माल नाकारतात. निर्यातीसाठी पूर्णपणे हिरवी आणि सरळ वाढलेली मिरची आवश्यक असते. अन्यथा या मालाला उठाव राहात नाही. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होते, असे विश्वनाथ डुकरे यांनी सांगितले.सारोळे गावातील ७५ ते ८० टक्के शेतकºयांचे तीव्र थंडीमुळे मिरची पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज या शेतकºयांनी व्यक्त केला. प्रकाश जेऊघाले यांनी दोन एकरात मिरचीची लागवड केली असून, या पिकापासून त्यांना चार ते पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.थंडीचा परिणाम झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तूर्तास तरी या परिसरातील शेतकºयांनी शेंडा खुडणीची कामे सुरू केली आहेत. फळबागांनाही काही प्रमाणात फटकाथंडीचा फळबागांनाही काही प्रमाणात फटका बसला असून, शेतकºयांचे नुकसान झाले आहे. खडक माळेगाव येथील विकास रायते यांच्या पेरूच्या बागेचे थंडीमुळे नुकसान झाले आहे. ऐन फळधारणेच्या वेळेत थंडी पडली. त्यामुळे झाडांवर मोठ्या प्रमाणात दव साचले. त्यात थंडीची तीव्रता वाढल्याने झाडांची नवीन पाने जळून गेली. याचा फळ धारणेवर परिणाम झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. द्राक्षाला पर्याय म्हणून शेतकरी फळबागांकडे वळत असले तरी फळबागांनाही लहरी निसर्गाचा मार सहन करावा लागत आहे.