शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

मिरचीच्या झाडांचा जळाला शेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 01:23 IST

नाशिक : सातत्याने पडणाºया तीव्र थंडीचा विविध पिकांवर परिणाम जाणवू लागला असून, शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द गावातील अनेक शेतकºयांच्या निर्यातक्षम मिरची पिकाचे तीव्र थंडीमुळे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देथंडीचा परिणाम : सारोळे खुर्द परिसरातील शेतकऱ्यांना फटका; खुडणीचा खर्च वाढला

संजय दुनबळे।नाशिक : सातत्याने पडणाºया तीव्र थंडीचा विविध पिकांवर परिणाम जाणवू लागला असून, शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द गावातील अनेक शेतकºयांच्या निर्यातक्षम मिरची पिकाचे तीव्र थंडीमुळे नुकसान झाले आहे.सारोळे खुर्द परिसरात मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. येथील अनेक शेतकºयांनी निर्यातक्षम मिरची पिकाची लागवड केली आहे. मागील दहा ते बारा दिवस सातत्याने पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम मिरची पिकाला फटका बसला आहे. अतिथंडीमुळे मिरचीच्या झाडांचे शेंडे जळून गेले आहेत. याचा झाडाला लागलेल्या मिरच्यांना फटका बसला आहे. मिरची काळी पडणे, पोषण कमी होणे असे प्रकार घडू लागल्याचे सारोळे खुर्द येथील ऋषिकेश जेऊघाले, प्रकाश जेऊघाले, विश्वनाथ डुकरे आदी शेतकºयांनी सांगितले.जून महिन्यात लागवड केलेल्या नंदिता वाणाच्या लवंगी मिरचीचे सुमारे आठ ते ९ महिने उत्पादन मिळत असते. यातील बहुतेक मालाची निर्यात होते किंवा देशांतर्गत विविध बाजारपेठांमध्ये विक्री होत असते. लवंगी मिरचीच्या पिकापासून शेतकºयांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असते. यावर्षी मागील दहा-बारा दिवस पडलेल्या तीव्र थंडीचा फटका या पिकाला बसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.तीव्र थंडीमुळे मिरचीच्या शेतातील काही झाडांचे शेंडे जळून गेले आहेत. झाडाचा शेंडा जळाल्यानंतर त्याची वाढ खुंटते. बºयाचवेळा झाडाला फळ येण्याचे प्रमाण कमी होते. शेंडा जळालेले झाड वाचवण्यासाठी शेतकºयांना शेंडा खुडणीचा खर्च करावा लागतो. खुडणी झालेल्या झाडाला पुन्हा नव्याने शेंडे येणे आवश्यक असते अन्यथा मोठे नुकसान होते असे ऋषिकेश जेऊघाले यांनी सांगितले.शेंडा जळालेल्या झाडाला आलेल्या मिरच्यांचा रंग काळा पडू लागतो. किंवा त्यांची पूर्ण क्षमतेने वाढ होत नाही. निर्यातदार असा माल नाकारतात. निर्यातीसाठी पूर्णपणे हिरवी आणि सरळ वाढलेली मिरची आवश्यक असते. अन्यथा या मालाला उठाव राहात नाही. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होते, असे विश्वनाथ डुकरे यांनी सांगितले.सारोळे गावातील ७५ ते ८० टक्के शेतकºयांचे तीव्र थंडीमुळे मिरची पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज या शेतकºयांनी व्यक्त केला. प्रकाश जेऊघाले यांनी दोन एकरात मिरचीची लागवड केली असून, या पिकापासून त्यांना चार ते पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.थंडीचा परिणाम झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तूर्तास तरी या परिसरातील शेतकºयांनी शेंडा खुडणीची कामे सुरू केली आहेत. फळबागांनाही काही प्रमाणात फटकाथंडीचा फळबागांनाही काही प्रमाणात फटका बसला असून, शेतकºयांचे नुकसान झाले आहे. खडक माळेगाव येथील विकास रायते यांच्या पेरूच्या बागेचे थंडीमुळे नुकसान झाले आहे. ऐन फळधारणेच्या वेळेत थंडी पडली. त्यामुळे झाडांवर मोठ्या प्रमाणात दव साचले. त्यात थंडीची तीव्रता वाढल्याने झाडांची नवीन पाने जळून गेली. याचा फळ धारणेवर परिणाम झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. द्राक्षाला पर्याय म्हणून शेतकरी फळबागांकडे वळत असले तरी फळबागांनाही लहरी निसर्गाचा मार सहन करावा लागत आहे.