शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

पवारांनी ज्यांना स्पर्श केला त्याचा परिस झाला

By admin | Updated: July 28, 2016 01:00 IST

विलास माने : दोडामार्गात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, पक्षनिरीक्षकांकडून आढावा

दोडामार्ग : राष्ट्रवादी सर्वसामान्यांचा पक्ष असून धर्मनिरपेक्षता जोपासणारा पक्ष आहे. कोणत्याही पक्षात चढ-उतार असतातच, मात्र शरद पवारांनी ज्यांना-ज्यांना स्पर्श केला, त्याचा परिस झाला. जो सरपंच होणार नव्हता, अशांना आमदार केले आणि जो आमदार होणार नव्हता, त्यांना मंत्री केले. त्यामुळे संघटना मजबुतीसाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक विलास माने यांनी केले.दोडामार्ग येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, कसई दोडामार्ग उपनगराध्यक्षा साक्षी कोरगावकर आदी उपस्थित होते. माने म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांना सोबत एकत्र घेऊन काम करणारा हा पक्ष असून, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाने त्याचे अस्तित्व संपूर्ण भारतात अधोरेखित झाले आहे. यामुळे किती आले आणि किती गेले, याचा हिशेब ठेवण्याची गरज नाही. ज्यांनी शरद पवारांना हाक दिली, त्यांना साहेबांनी नेताच केला आहे. सेना-भाजपवाल्यांनी तर जनतेची दिशाभूलच केली आहे. ते बोलतात एक आणि करतात एक. खोटं बोलायचं पण ते रेटून बोलावे, अशी त्यांची पध्दत आहे. जनतेच्या हे आता लक्षात आले असून, आगामी काळ आपलाच आहे. त्यामुळे तळागाळात संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन केले. सुरेश दळवी यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीसाठी कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. (प्रतिनिधी)दोडामार्ग येथे विलास राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश दळवी, व्हिक्टर डान्टस, प्रविण भोसले, कसई दोडामार्ग उपनगराध्यक्षा साक्षी कोरगावकर उपस्थित होत्या.