शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककर जनता प्रामाणिक लोकांना सांभाळणारी आबांनी केले होते दिंडोरीच्या जनतेचे कौतुक, कादवाची भेट ठरली अखेरचीच

By admin | Updated: February 17, 2015 00:22 IST

नाशिककर जनता प्रामाणिक लोकांना सांभाळणारी आबांनी केले होते दिंडोरीच्या जनतेचे कौतुक, कादवाची भेट ठरली अखेरचीच

नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री आमदार आर. आर. आबांच्या हस्ते बरोबर १०८ दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी झाला होता. आबांची ती नाशिकची भेट अखेरचीच भेट ठरली. आबांनी त्यानंतर लगोलग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या शपथविधीला हजेरी लावली होती.आबांचे नाशिकशी संबंध नेहमीच सलोख्याचे व स्नेहाचे राहिले आहेत. ग्रामविकासमंत्री असल्यापासून ते उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होईपर्यंत आबांचे नाशिकला सातत्याने येणे-जाणे होते. नाशिकमधील सहकार क्षेत्रातील एकमेव नफ्यात असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ दिंडोरीचे स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व आर आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ आॅक्टोबर २०१४ रोेजी झाला. कार्यक्रमास कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे,आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, जिल्हा बॅँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी बरोबर दुपारी एक वाजता आबांचे कादवा साखर कारखान्यावर तयार केलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने आगमन झाले. कादवा गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी आबांनी अतिशय भावस्पर्शी व हृदयस्पर्शी भाषण करीत उपस्थितांची दाद मिळविली होती. देशभरात असलेल्या मोदी लाटेच्या विरोधात मनमिळावू व प्रामाणिक अशा आमदाराची निवड दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने केली. येथील लोक प्रामाणिक माणसांना सांभाळून घेतात. या निवडणुकीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मतांसाठी अर्थकारण केले जात असताना दिंडोरी येथील जनतेने मात्र नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या उमेदवाराला मतेही दिली आणि वर्गणी काढून पैसेही दिले. येथील जनता प्रामाणिक लोकांना सांभाळणारी असल्याचे आर. आर. पाटील यांनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद केले होते. तब्बल ४५ मिनिटांच्या भाषणात आबांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला होता. कार्यक्रमानंतर दुपारी अडीच्या सुमारास लगेचच आबा मुंबईला फडणवीस सरकारच्या शपथविधीसाठी गेले होते. शपथविधीनंतर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आबा उपस्थित होते. त्यानंतर लगेचच आबांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात आबांनी हजेरी लावली नाही. नाशिकच्या कादवा साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा सार्वजनिक कार्यक्रम बहुधा आबांचा शेवटचाच ठरला. दिंडोरीसह नाशिककरांना आबांची अशी ‘एक्झिट’ मनाला चटका लावणारी ठरली.(प्रतिनिधी)