शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

नाशिककर जनता प्रामाणिक लोकांना सांभाळणारी आबांनी केले होते दिंडोरीच्या जनतेचे कौतुक, कादवाची भेट ठरली अखेरचीच

By admin | Updated: February 17, 2015 00:22 IST

नाशिककर जनता प्रामाणिक लोकांना सांभाळणारी आबांनी केले होते दिंडोरीच्या जनतेचे कौतुक, कादवाची भेट ठरली अखेरचीच

नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री आमदार आर. आर. आबांच्या हस्ते बरोबर १०८ दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी झाला होता. आबांची ती नाशिकची भेट अखेरचीच भेट ठरली. आबांनी त्यानंतर लगोलग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या शपथविधीला हजेरी लावली होती.आबांचे नाशिकशी संबंध नेहमीच सलोख्याचे व स्नेहाचे राहिले आहेत. ग्रामविकासमंत्री असल्यापासून ते उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होईपर्यंत आबांचे नाशिकला सातत्याने येणे-जाणे होते. नाशिकमधील सहकार क्षेत्रातील एकमेव नफ्यात असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ दिंडोरीचे स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व आर आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ आॅक्टोबर २०१४ रोेजी झाला. कार्यक्रमास कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे,आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, जिल्हा बॅँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी बरोबर दुपारी एक वाजता आबांचे कादवा साखर कारखान्यावर तयार केलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने आगमन झाले. कादवा गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी आबांनी अतिशय भावस्पर्शी व हृदयस्पर्शी भाषण करीत उपस्थितांची दाद मिळविली होती. देशभरात असलेल्या मोदी लाटेच्या विरोधात मनमिळावू व प्रामाणिक अशा आमदाराची निवड दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने केली. येथील लोक प्रामाणिक माणसांना सांभाळून घेतात. या निवडणुकीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मतांसाठी अर्थकारण केले जात असताना दिंडोरी येथील जनतेने मात्र नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या उमेदवाराला मतेही दिली आणि वर्गणी काढून पैसेही दिले. येथील जनता प्रामाणिक लोकांना सांभाळणारी असल्याचे आर. आर. पाटील यांनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद केले होते. तब्बल ४५ मिनिटांच्या भाषणात आबांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला होता. कार्यक्रमानंतर दुपारी अडीच्या सुमारास लगेचच आबा मुंबईला फडणवीस सरकारच्या शपथविधीसाठी गेले होते. शपथविधीनंतर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आबा उपस्थित होते. त्यानंतर लगेचच आबांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात आबांनी हजेरी लावली नाही. नाशिकच्या कादवा साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा सार्वजनिक कार्यक्रम बहुधा आबांचा शेवटचाच ठरला. दिंडोरीसह नाशिककरांना आबांची अशी ‘एक्झिट’ मनाला चटका लावणारी ठरली.(प्रतिनिधी)