शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

प्रलंबित अहवाल सलग पाचव्या दिवशी तीन हजारानजीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:27 IST

नाशिक : जिल्ह्यात एकीकडे सलग तिसऱ्या दिवशी हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळत असतानाच प्रलंबित अहवालांची संख्यादेखील सातत्याने पाचव्या दिवशी तीन ...

नाशिक : जिल्ह्यात एकीकडे सलग तिसऱ्या दिवशी हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळत असतानाच प्रलंबित अहवालांची संख्यादेखील सातत्याने पाचव्या दिवशी तीन हजारांच्या आसपास रहात आहे. औरंगाबादला पाठवलेल्या अहवालांपैकी हजारहून अधिक अहवाल सातत्याने प्रलंबित राहणे, तसेच पुण्याला जाणाऱ्या अहवालांतूनही निम्मेच अहवाल प्राप्त होत असल्याने अहवाल प्रलंबित राहण्याचे सततचे मोठे प्रमाण नागरिकांसाठी प्रतीक्षेचे तर आरोग्य विभागासाठी चिंतेचे कारण ठरत आहे.

नाशकात गतत आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढू लागले होते; मात्र त्या प्रमाणात कोरोनाचे अहवाल प्राप्त होत नव्हते. त्यामुळे बुधवारपर्यंत कोरोना बाधितांचा अहवाल प्रलंबित राहण्याची संख्या पाच हजारांहून अधिक झाली होती. त्यात औरंगाबादच्या प्रयोगशाळेत सर्वाधिक ैअहवाल प्रलंबित हाेते. आरोग्य यंत्रणादेखील सातत्याने पाठपुरावा करीत असूनही तेथील यंत्रणाच नादुरुस्त झाल्याने अहवाल मिळण्यास चार दिवसांहून अधिक विलंब लागत होता. पुणे, मुंबईहून अहवाल मिळू लागल्यानंतर बाधित संख्येचा आकडा सातत्याने हजार-बाराशेदरम्यान दिसू लागला आहे. मागील चार दिवसात बाधितांच्या संख्येत गत आठवडाभराच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढ झाली असल्याने अद्यापही प्रलंबित अहवालांची संख्या २८३३ वर आलेली आहे. दरम्यान पुढील आठवड्यापर्यंत अजूनही बाधित संख्या हजाराच्या वर राहण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत असल्याने जिल्हा प्रशासनावर चिंतेचे सावट पसरले आहे.

इन्फो....

बाधित संख्या वाढल्याने प्रलंबितमध्ये वाढ

आठवड्याच्या प्रारंभी अहवाल बाधित राहण्याचे प्रमाण पाच हजारांवर पोहोचले होते. औरंगाबादची यंत्रणा ठप्प झाल्याने अहवाल खोळंबले होते; मात्र आता तिथे नमुने पाठवणेच बंद करण्यात आले असून, नाशिकसह पुणे, मुंबईलाच नमुने पाठवले जात आहेत; मात्र नमुन्यांची संख्या अधिक झाल्यानेच अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाणदेखील मोठे आहे.

डॉ. अनंत पवार, जिल्हा रुग्णालय.