शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

साठवण तलावात पोहणाऱ्या तीन युवकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:27 IST

येवला : येवला नगर परिषदेच्या साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांना नगरपालिकेच्या विशेष पथकाने पकडले. या तीन युवकांचे मोबाइल पथकाने जप्त केले असून, त्यांना ५०० रु पयांचा दंड करण्यात आला. येवला पालिकेच्या साठवण तलावाचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो; मात्र काही जण या तलावात पोहत असल्याचे निदर्शनास येत होते.

ठळक मुद्दे नगरपालिकेने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाने आतापर्यंत अवैध नळ कनेक्शन बंद करणे, पाणी वाया घालविणाºया नागरिकांना दंड ठोठावणे तसेच पाण्याचा गरजेपुरता वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे अशी कामे हाती घेतली आहेत.

येवला : येवला नगर परिषदेच्या साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांना नगरपालिकेच्या विशेष पथकाने पकडले. या तीन युवकांचे मोबाइल पथकाने जप्त केले असून, त्यांना ५०० रु पयांचा दंड करण्यात आला. येवला पालिकेच्या साठवण तलावाचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो; मात्र काही जण या तलावात पोहत असल्याचे निदर्शनास येत होते. या साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या अनेक युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या साठवण तलावात स्वत:च्या जिवाशी खेळणाºया तीन युवकांना पालिकेने धडा शिकविला आहे; मात्र अशाच प्रकारची सुरक्षा कायमस्वरूपी ठेवावी, अशी अपेक्षा आहे. पोहणाºया युवकांना दंड केल्याने आता पोहण्यासाठी कोणीही धजवणार नाही; मात्र तलावाच्या बाजूला संरक्षक भिंत असल्याने अनेक जीव वाचतील व साठवण तलावाचे अस्तरीकरण केले तर पाणी गळतीदेखील थांबेल. पाण्याअभावी भटकंती करण्याची वेळ येणार नाही. तसेच साठवण तलावाचे अस्तरीकरण किंवा प्लॅस्टिक कागद टाकणे यांसारख्या उपाययोजना राबविल्या तर पाणी चोरीसाठी मोठा प्रतिबंध होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेने याबाबतदेखील कार्यवाही करावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.तसेच नगरपालिकेने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाने आतापर्यंत अवैध नळ कनेक्शन बंद करणे, पाणी वाया घालविणाºया नागरिकांना दंड ठोठावणे तसेच पाण्याचा गरजेपुरता वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे अशी कामे हाती घेतली आहेत. तसेच साठवण तलावातील पाण्याची चोरी होऊ नये यासाठी पथक विशेष लक्ष पुरवीत आहे. सदर पथकाने शहर हद्दीतील विनापरवानगी चालू असलेले बोअरिंगचे काम बंद पाडून संबंधितांकडून दंड वसूल केल्याची माहिती पालिकेने दिली आहे.आचारसंहिता असल्याने प्रत्येक कारवाई गंभीरतेने करण्यात येत आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा गरजेपुरता वापर करावा तसेच इतरांनाही पाणी मिळेल याची काळजी घेऊन नगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी केले. (१६ येवला साठवण तलाव)