शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पीक नियोजन कोलमडले

By admin | Updated: June 24, 2014 00:35 IST

सायगाव : येवला तालुक्याच्या दुष्काळ पाठ सोडायला तयार नसून, १९७२च्या दुष्काळापासून कमी-अधिक पर्जन्यमानावर, निसर्गाच्या लहरी-पणावर हिरवे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांची सतत घोर निराशाच झाली आहे.

सायगाव : येवला तालुक्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ पाठ सोडायला तयार नसून, १९७२च्या दुष्काळापासून कमी-अधिक पर्जन्यमानावर, निसर्गाच्या लहरी-पणावर हिरवे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांची सतत घोर निराशाच झाली आहे. अत्यल्प पावसामुळे कधी खरीप तर कधी रब्बी हंगामातील पिके करपली. यंदाही पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.गतवर्षाचे रोगट हवामान, बेमोसमी पाऊस आणि गारपिटीने झोडपलेला शेतकरी कसाबसा सावरून नव्या खरीप हंगामाच्या तयारीला लागला. शेतीची सर्व मशागत आटोपून पाऊस पडला की लागवड करायची. हारलेला डाव पुन्हा खेळायचा ! पण रोहिणी, मृग नक्षत्रे संपली तरीही पाऊस नाही. हवामान खाते व पंचांग तसेच निसर्गातील अनेक ढोबळ संकेतानुसार पुढेही एक महिना पाऊस पडेल तर तो सरासरी किती पडेल, हेही निसर्गाच्याच स्वाधीन असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पीककर्ज काढून जमिनीची मशागत व बियाणे खरेदी करून बसलेला शेतकरी आज आभाळाकडे डोळे लावून आहे. खरीप हंगामासाठी रोहिणी, मृग व आर्द्रा ही तिन्ही नक्षत्रे योग्य असतात. या काळात पिकांची लागवड झाल्यास पिके शेवटपर्यंत तग धरतात. रोगाला बळी पडत नाही. उत्पादनही चांगले येते, परिणामी उत्पादन खर्चही कमी होतो. मात्र रोहिणी आणि मृग कोरडी गेली. आर्द्रा नक्षत्राच्या तोंडावर सोसाट्याचा वारा सुटल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे स्वप्न भंगण्याच्या मार्गावर आहे.उशिरा पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना कपाशी, मका, बाजरी आदि पिकांचे उत्पादन कमी मिळणार आहे. खरीप हंगामातील कांदा लागवडही लांबणार आहे. एकूणच शेती अर्थव्यवस्थेवर त्याचे दुष्परिणाम होणार आहे. पावसाळा लांबल्याने पीक लागवडीचे आराखडेही बदलणार आहे. कमी पाण्यावर व कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या लागवडीला अशा दुष्काळी परिस्थितीत शेतकरी प्राधान्य देतात. मका पिकाचे लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.पावसाअभावी सर्वत्र बाजारपेठा ओस पडल्या आहे. ग्रामीण भागातील रोजगार थंडावल्यामुळे प्रत्येक जण हात आखडूनच काटकसर करत आहे. गेलेला पाऊस आषाढी एकादशीला येईल. ही आशा उरी बाळगून शेतकरीवर्ग पावसाची प्रतीक्षा करीत आहे. (वार्ताहर)