शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पीक नियोजन कोलमडले

By admin | Updated: June 24, 2014 00:35 IST

सायगाव : येवला तालुक्याच्या दुष्काळ पाठ सोडायला तयार नसून, १९७२च्या दुष्काळापासून कमी-अधिक पर्जन्यमानावर, निसर्गाच्या लहरी-पणावर हिरवे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांची सतत घोर निराशाच झाली आहे.

सायगाव : येवला तालुक्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ पाठ सोडायला तयार नसून, १९७२च्या दुष्काळापासून कमी-अधिक पर्जन्यमानावर, निसर्गाच्या लहरी-पणावर हिरवे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांची सतत घोर निराशाच झाली आहे. अत्यल्प पावसामुळे कधी खरीप तर कधी रब्बी हंगामातील पिके करपली. यंदाही पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.गतवर्षाचे रोगट हवामान, बेमोसमी पाऊस आणि गारपिटीने झोडपलेला शेतकरी कसाबसा सावरून नव्या खरीप हंगामाच्या तयारीला लागला. शेतीची सर्व मशागत आटोपून पाऊस पडला की लागवड करायची. हारलेला डाव पुन्हा खेळायचा ! पण रोहिणी, मृग नक्षत्रे संपली तरीही पाऊस नाही. हवामान खाते व पंचांग तसेच निसर्गातील अनेक ढोबळ संकेतानुसार पुढेही एक महिना पाऊस पडेल तर तो सरासरी किती पडेल, हेही निसर्गाच्याच स्वाधीन असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पीककर्ज काढून जमिनीची मशागत व बियाणे खरेदी करून बसलेला शेतकरी आज आभाळाकडे डोळे लावून आहे. खरीप हंगामासाठी रोहिणी, मृग व आर्द्रा ही तिन्ही नक्षत्रे योग्य असतात. या काळात पिकांची लागवड झाल्यास पिके शेवटपर्यंत तग धरतात. रोगाला बळी पडत नाही. उत्पादनही चांगले येते, परिणामी उत्पादन खर्चही कमी होतो. मात्र रोहिणी आणि मृग कोरडी गेली. आर्द्रा नक्षत्राच्या तोंडावर सोसाट्याचा वारा सुटल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे स्वप्न भंगण्याच्या मार्गावर आहे.उशिरा पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना कपाशी, मका, बाजरी आदि पिकांचे उत्पादन कमी मिळणार आहे. खरीप हंगामातील कांदा लागवडही लांबणार आहे. एकूणच शेती अर्थव्यवस्थेवर त्याचे दुष्परिणाम होणार आहे. पावसाळा लांबल्याने पीक लागवडीचे आराखडेही बदलणार आहे. कमी पाण्यावर व कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या लागवडीला अशा दुष्काळी परिस्थितीत शेतकरी प्राधान्य देतात. मका पिकाचे लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.पावसाअभावी सर्वत्र बाजारपेठा ओस पडल्या आहे. ग्रामीण भागातील रोजगार थंडावल्यामुळे प्रत्येक जण हात आखडूनच काटकसर करत आहे. गेलेला पाऊस आषाढी एकादशीला येईल. ही आशा उरी बाळगून शेतकरीवर्ग पावसाची प्रतीक्षा करीत आहे. (वार्ताहर)