शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

किरकोळ घटना वगळता शहरात शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:51 AM

नाशिक : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर करण्यात आलेल्या दगडफेकीचे पडसाद मंगळवारी शहरात उमटले़ नाशिकरोड-जेलरोड व सारडा सर्कल परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस तर सातपूर-आयटीआय पुलाजवळ शाळेची खासगी बस व दोन खासगी वाहनांंवर समाजकंटकांनी दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या़ या घटना वगळता शहरात शांतता असून, नाशिकरोड परिसरातील २० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़

ठळक मुद्देभीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद : आज नाशिक बंद, शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त;सोशल मीडियावरील अफवांमुळे वाढला तणावनाशिकरोड परिसरातील २० संशयितांना ताब्यात

07 वाहनांचे झाले नुकसान20 संशयित घेतले ताब्यात1500 पोलिसांचा ताफा

नाशिक : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर करण्यात आलेल्या दगडफेकीचे पडसाद मंगळवारी शहरात उमटले़ नाशिकरोड-जेलरोड व सारडा सर्कल परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस तर सातपूर-आयटीआय पुलाजवळ शाळेची खासगी बस व दोन खासगी वाहनांंवर समाजकंटकांनी दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या़ या घटना वगळता शहरात शांतता असून, नाशिकरोड परिसरातील २० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़ दरम्यान, बुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुमारे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर अफवा पसविणाºयांवर सायबर सेलची नजर असून, अशांवर कारवाई केली जाणार आहे़सोशल मीडियावरून पसरलेल्या संदेशामुळे भीमा-कोरेगाव घटनेचे राज्यात सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटले़ नाशिकरोड परिसरातील सामाजिक संघटनांनी या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले़ दुपारी देवळाली कॅम्प परिसर बंद ठेवण्यात आला तर गरवारे पॉइंटवर रास्ता-रोकोसाठी आलेल्यांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले़ सोशल मीडियावर वॉचसोशल मीडियावरील फे सबुक, व्हॉट्स अ‍ॅप, टिष्ट्वटर याद्वारे भीमा-कोरेगाव घटनेबाबत मोठ्या संख्येने व्हिडीओ तसेच भडकविणारे संदेश पाठविण्यात आले असून, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे अशा प्रकारचे संदेश पाठविणारे ग्रुप, तसेच व्यक्तींवर आयुक्तालयातील सायबर शाखेचा विशेष वॉच आहे़ त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे संदेश व्हायरल न करता डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ आयुक्तालयात शांतता समितीची बैठकभीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालयात मंगळवारी सायंकाळी आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले़ आमदार सीमा हिरे यांनी नाशिक हे शांतताप्रिय शहर असून, त्यास गालबोट लागणार नाही याबाबत सदस्यांनी काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले़ यावेळी शांतता समितीतील सर्वधर्मिय सदस्यांसह पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते़दीड हजार पोलीस रस्त्यावरविविध राजकीय पक्ष व संघटनांनी घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (दि़३) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात अफवा पसरून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील ११० वरिष्ठ पोलीस अधिकारी, दीड हजार पोलीस कर्मचारी, आरसीपी, क्यूआरटीच्या टीम रस्त्यावर असणार आहे़ याबरोबरच एसआरपीएफ व होमगार्डची जादा कुमक बंदोबस्तासाठी मागविण्यात आली आहे़ कायदा हातात घेऊ नकाभीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदाव सुव्यवस्थेसाठी पोलिसांच्या साप्ताहिकसुट्या बंद करण्यात आल्या आहेत़ शहरात दीडहजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ठिकठिकाणी नाकाबंदी व चेक पॉइंट लावण्यात आला आहे़ सोशल मीडियावर अफवा व भडकाऊ संदेश पाठविणाºयांवर सायबर सेलचा वॉच असून, थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत़- डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक