शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आयोगाच्या निधीमध्ये बिले भरायची की, गावाचा विकास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:17 IST

पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची बिले यापूर्वी शासनामार्फत भरण्यात येत होती. मात्र, ग्रामपंचायतींना ही बिले आता १५ व्या ...

पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची बिले यापूर्वी शासनामार्फत भरण्यात येत होती. मात्र, ग्रामपंचायतींना ही बिले आता १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरली जावीत अशा सूचना शासनाने केल्या. त्यात आयोगाच्या निधीमध्ये बिले भरायची की, गावाचा विकास करायचा असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाला पडला असून या निर्णयाविरोधात सरपंच आक्रमक झाले आहेत.

निफाड तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल जाधव याप्रश्नी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शासनाने सध्या ग्रामपंचायतींना पत्रे पाठवून पथदिव्यांची बिले थकीत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित थकीत बिलासाठी वीज कंपनीकडून वीज जोडणी खंडित केली असून गावात काळोख निर्माण झाला. परिणामी चोऱ्या, मारामारी असे प्रकार वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच वित्त आयोगातून पाणीपुरवठा, रेन वॉटर, हार्वेस्टिंग, नळ योजना दुरुस्ती, गाळ व्यवस्थापन, सेफ्टिक टॅंकमधील गाळ उसणी मशीन खरेदी, प्राथमिक शाळा, अंगणवाडी व इतर ठिकाणीचे स्वच्छतागृह, भूमिगत व बंदिस्त गटारे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना साहित्य पुरविणे, आरोग्य शिबिर आदी कामांवर तो निधी खर्च करावा लागतो. मात्र, जर पाणीपुरवठा, पथदिव्यांची बिले भरली तर या सर्व विकास कामांना पूर्ण विराम लागेल. त्यामुळे शासनाने लक्ष द्यावे आणि विकासाला अडथळा निर्माण होणाऱ्या निर्णयाला त्वरित स्थगिती देण्याची मागणी जाधव यांनी केली आहे .

---------------------------

ग्रामपंचायतींमधील वाढल्या अडचणी

अगोदरच आराखडे तयार ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी १५ व्या वित्त आय़ोगातून निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी हेडनिहाय यापूर्वीच आराखडे तयार केले आहेत. त्यामध्ये पथदिव्यांची बिले भरण्याची तरतूदच करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर बिले कोणत्या हेडमधून भरायची याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आणि १५ वित्त आयोगातून भरले तर गावाचा विकास कसा कारायचा ..! छोट्या पंचायतींची अडचण वाढली. ज्या छोट्या ग्रामपंचायती आहेत. त्यांच्यावर आता वीज बिलाचा भुर्दंड पडणार आहे. तो संबंधित ग्रामपंचायतींना न पडवडणाराच ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे आता वीज बिलासाठी निधीचाही प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे छोट्या ग्रामपंचायतीपुढील अडचणी वाढल्या आहेत.

------------------------------

ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बिकट असताना शासनाने त्यांच्यावर लावलेला वीज बिलाचा भुर्दंड कमी करणे आवश्यक आहे. अन्यथा ग्रामपंचायतीचा आर्थिक बोजावारा उडेल. त्याअनुषंगाने शासनाचे गावाच्या विकासासाठी तो निर्णय मागे घ्यावा .

- अमोल जाधव, सरपंच, मुखेड (ता. निफाड)

130721\img_20210712_223529.jpg

सरपंच अमोल जाधव