शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

आयोगाच्या निधीमध्ये बिले भरायची की, गावाचा विकास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:17 IST

पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची बिले यापूर्वी शासनामार्फत भरण्यात येत होती. मात्र, ग्रामपंचायतींना ही बिले आता १५ व्या ...

पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची बिले यापूर्वी शासनामार्फत भरण्यात येत होती. मात्र, ग्रामपंचायतींना ही बिले आता १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरली जावीत अशा सूचना शासनाने केल्या. त्यात आयोगाच्या निधीमध्ये बिले भरायची की, गावाचा विकास करायचा असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाला पडला असून या निर्णयाविरोधात सरपंच आक्रमक झाले आहेत.

निफाड तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल जाधव याप्रश्नी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शासनाने सध्या ग्रामपंचायतींना पत्रे पाठवून पथदिव्यांची बिले थकीत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित थकीत बिलासाठी वीज कंपनीकडून वीज जोडणी खंडित केली असून गावात काळोख निर्माण झाला. परिणामी चोऱ्या, मारामारी असे प्रकार वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच वित्त आयोगातून पाणीपुरवठा, रेन वॉटर, हार्वेस्टिंग, नळ योजना दुरुस्ती, गाळ व्यवस्थापन, सेफ्टिक टॅंकमधील गाळ उसणी मशीन खरेदी, प्राथमिक शाळा, अंगणवाडी व इतर ठिकाणीचे स्वच्छतागृह, भूमिगत व बंदिस्त गटारे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना साहित्य पुरविणे, आरोग्य शिबिर आदी कामांवर तो निधी खर्च करावा लागतो. मात्र, जर पाणीपुरवठा, पथदिव्यांची बिले भरली तर या सर्व विकास कामांना पूर्ण विराम लागेल. त्यामुळे शासनाने लक्ष द्यावे आणि विकासाला अडथळा निर्माण होणाऱ्या निर्णयाला त्वरित स्थगिती देण्याची मागणी जाधव यांनी केली आहे .

---------------------------

ग्रामपंचायतींमधील वाढल्या अडचणी

अगोदरच आराखडे तयार ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी १५ व्या वित्त आय़ोगातून निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी हेडनिहाय यापूर्वीच आराखडे तयार केले आहेत. त्यामध्ये पथदिव्यांची बिले भरण्याची तरतूदच करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर बिले कोणत्या हेडमधून भरायची याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आणि १५ वित्त आयोगातून भरले तर गावाचा विकास कसा कारायचा ..! छोट्या पंचायतींची अडचण वाढली. ज्या छोट्या ग्रामपंचायती आहेत. त्यांच्यावर आता वीज बिलाचा भुर्दंड पडणार आहे. तो संबंधित ग्रामपंचायतींना न पडवडणाराच ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे आता वीज बिलासाठी निधीचाही प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे छोट्या ग्रामपंचायतीपुढील अडचणी वाढल्या आहेत.

------------------------------

ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बिकट असताना शासनाने त्यांच्यावर लावलेला वीज बिलाचा भुर्दंड कमी करणे आवश्यक आहे. अन्यथा ग्रामपंचायतीचा आर्थिक बोजावारा उडेल. त्याअनुषंगाने शासनाचे गावाच्या विकासासाठी तो निर्णय मागे घ्यावा .

- अमोल जाधव, सरपंच, मुखेड (ता. निफाड)

130721\img_20210712_223529.jpg

सरपंच अमोल जाधव