शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

आयोगाच्या निधीमध्ये बिले भरायची की, गावाचा विकास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:17 IST

पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची बिले यापूर्वी शासनामार्फत भरण्यात येत होती. मात्र, ग्रामपंचायतींना ही बिले आता १५ व्या ...

पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची बिले यापूर्वी शासनामार्फत भरण्यात येत होती. मात्र, ग्रामपंचायतींना ही बिले आता १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरली जावीत अशा सूचना शासनाने केल्या. त्यात आयोगाच्या निधीमध्ये बिले भरायची की, गावाचा विकास करायचा असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाला पडला असून या निर्णयाविरोधात सरपंच आक्रमक झाले आहेत.

निफाड तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल जाधव याप्रश्नी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शासनाने सध्या ग्रामपंचायतींना पत्रे पाठवून पथदिव्यांची बिले थकीत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित थकीत बिलासाठी वीज कंपनीकडून वीज जोडणी खंडित केली असून गावात काळोख निर्माण झाला. परिणामी चोऱ्या, मारामारी असे प्रकार वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच वित्त आयोगातून पाणीपुरवठा, रेन वॉटर, हार्वेस्टिंग, नळ योजना दुरुस्ती, गाळ व्यवस्थापन, सेफ्टिक टॅंकमधील गाळ उसणी मशीन खरेदी, प्राथमिक शाळा, अंगणवाडी व इतर ठिकाणीचे स्वच्छतागृह, भूमिगत व बंदिस्त गटारे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना साहित्य पुरविणे, आरोग्य शिबिर आदी कामांवर तो निधी खर्च करावा लागतो. मात्र, जर पाणीपुरवठा, पथदिव्यांची बिले भरली तर या सर्व विकास कामांना पूर्ण विराम लागेल. त्यामुळे शासनाने लक्ष द्यावे आणि विकासाला अडथळा निर्माण होणाऱ्या निर्णयाला त्वरित स्थगिती देण्याची मागणी जाधव यांनी केली आहे .

---------------------------

ग्रामपंचायतींमधील वाढल्या अडचणी

अगोदरच आराखडे तयार ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी १५ व्या वित्त आय़ोगातून निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी हेडनिहाय यापूर्वीच आराखडे तयार केले आहेत. त्यामध्ये पथदिव्यांची बिले भरण्याची तरतूदच करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर बिले कोणत्या हेडमधून भरायची याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आणि १५ वित्त आयोगातून भरले तर गावाचा विकास कसा कारायचा ..! छोट्या पंचायतींची अडचण वाढली. ज्या छोट्या ग्रामपंचायती आहेत. त्यांच्यावर आता वीज बिलाचा भुर्दंड पडणार आहे. तो संबंधित ग्रामपंचायतींना न पडवडणाराच ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे आता वीज बिलासाठी निधीचाही प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे छोट्या ग्रामपंचायतीपुढील अडचणी वाढल्या आहेत.

------------------------------

ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बिकट असताना शासनाने त्यांच्यावर लावलेला वीज बिलाचा भुर्दंड कमी करणे आवश्यक आहे. अन्यथा ग्रामपंचायतीचा आर्थिक बोजावारा उडेल. त्याअनुषंगाने शासनाचे गावाच्या विकासासाठी तो निर्णय मागे घ्यावा .

- अमोल जाधव, सरपंच, मुखेड (ता. निफाड)

130721\img_20210712_223529.jpg

सरपंच अमोल जाधव