शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

बागलाणच्या पश्चिम पट्यात सर्व रस्त्यात खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 18:56 IST

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील सर्वच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एक ते दीड फुट खोलीच्या खड्यातून प्रवाशांना दणके बसत असल्याने आहे.

ठळक मुद्देअपघातांच्या संख्येत वाढ : विरगाव ते वटार रस्त्याची झाली चाळण

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील सर्वच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एक ते दीड फुट खोलीच्या खड्यातून प्रवाशांना दणके बसत असल्याने आहे.तालुक्यातील पश्चिम पट्यातील सटाणा-तळवाडे रस्त्यावर वटार ते डोंगरेज दरम्यान मोठा खड्डे पडले असून तेथील रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे. हा रस्ता तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्याचा व महत्वाचा रस्ता आहे. दररोज १० ते १५ गावातील लहान मोठे वाहने या रस्त्यावरून ये-जा करत असतात. गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्याकडे सार्वजनिक बाधकाम विभागासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांना खड्यातून मार्ग काढावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी अनेकदा मागणी करून देखील त्या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.विरगांव ते वटार हा चार किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाला असून बऱ्याच ठिकाणी तर खड्यांचे साम्राज्य झाले आहे. रस्त्याची चालणं झाली आहे. खड्डे टाळण्याच्या बेतात अनेक छोटे मोठे अपघातही येथे झाले आहेत. वटार ते विरगांव हा चार किलोमीटर रास्ता शेतकºयांसाठी महत्वाचा असून हा रस्ता राज्य महामार्ग विंचुर-प्रकाशाला जोडला जातो. त्यामुळे येथील भाजीपाला टमाटे, कांदा, मिरची शेतीमालाचे उत्पन्न मोठी बाजारपेठ असलेले शहरे सूरत, अहमदाबाद, बडुच, मुंबईला जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकºयांना माल घेऊन जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच ताहाराबादकडे शिक्षणसाठी जाणाºया विद्यार्थांच्या वाहन चालकाना सुद्धा मोठी कसरत करावी लागते.उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळ कपालेश्वर येथे येणाºया भाविकांना सुद्धा हाच मार्ग असल्यामुळे अनेक भाविक श्रावण महिन्यात येथे येण्याचे टाळतात तसेच परिसरातील नागरिकांना दैनंदिन दलण-वळणासाठी हाच रास्ता असल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकरी करत आहेत.चौकटविरगावं ते वटार रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून मोटरसायकलीने प्रवास करणाºयांना तारेवरची कसरत कारवी लागत आहे. खड्डे टाळण्याच्या बेतात कायम छोटे छोटे अपघात होत असत्ल्याने बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी.कल्पना खैरनार सरपंच, वटार.