शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
4
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
5
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
6
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
7
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
8
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
9
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
10
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
11
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
12
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
13
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
14
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
15
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
16
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
17
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
18
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
19
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
20
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
Daily Top 2Weekly Top 5

पतीराजांचा गावपातळीच्या कारभारात धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 21:01 IST

घोटी : राजकारणात महिलांना समान वाटा मिळाल्याने केवळ ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेत अडकलेल्या ग्रामीण भागातील महिलांना आरक्षण ही सुवर्णसंधी ठरली आहे. दुर्दैवाने इगतपुरी तालुक्यातील ४६ गावांचा कारभार सांभाळणाऱ्या महिला सरपंच आणि ११ महिला उपसरपंचाच्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्या पतींचा राज्यकारभार सुरू आहे, त्यामुळे महिलांच्या नेतृत्वगुणांना केराची टोपली मिळाल्याचे चित्र आहे. याला सरपंच पती अर्थात ‘एसपीं’चा गाव कारभारात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप वाढल्याचे महत्वाचे कारण आहे.

ठळक मुद्देइगतपुरी तालुक्यातील सरपंचमहिला सरपंचांची होतेय घुसमट

भास्कर सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : राजकारणात महिलांना समान वाटा मिळाल्याने केवळ ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेत अडकलेल्या ग्रामीण भागातील महिलांना आरक्षण ही सुवर्णसंधी ठरली आहे. दुर्दैवाने इगतपुरी तालुक्यातील ४६ गावांचा कारभार सांभाळणाऱ्या महिला सरपंच आणि ११ महिला उपसरपंचाच्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्या पतींचा राज्यकारभार सुरू आहे, त्यामुळे महिलांच्या नेतृत्वगुणांना केराची टोपली मिळाल्याचे चित्र आहे. याला सरपंच पती अर्थात ‘एसपीं’चा गाव कारभारात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप वाढल्याचे महत्वाचे कारण आहे.जोशात असलेले सरपंच पतीराज थेट पंचायत समिती आणि तहसीलदार कार्यालयात स्वत: सरपंच असल्याच्या फुशारक्या मारीत असल्याचे दिसून आलेले आहे. यामुळे महिलांना सत्तेत ५० टक्के वाटा देण्याचा मूळ उद्धेश पुर्णपणे अयशस्वी होत आहे. सरपंच पतीराज थांबवून महिला सरपंचांना अधिकाधिक सक्षम करावे अशी मागणी होत आहे.इगतपुरी तालुक्यात ४६ गावांमध्ये महिला सरपंच निवडून आल्या आहेत. उपसरपंचपद महिलांसाठी आरक्षित नसले तरीही १४ गावांमध्ये उपसरपंचपदी महिलांची ह्या पदावर निवड झालेली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना निम्मा वाटा देण्याचा सरकारचा उद्धेश चांगलाच साध्य झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र सरपंच पतीराजांचे वाढते वर्चस्व त्यांच्या अधिकारांवर गदा आणीत असून बºयाच सरपंच महिलांवर ‘सयाजीराव’ बनण्याची वेळ आली आहे.बहुतांश गावातील महिला सरपंच सुशिक्षित आहेत. म्हणून या वर्षी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक महिला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत:हून पुढे सरसावल्या. गावाच्या विकासाचा आराखडा मतदारांच्या पुढे प्रभावीपणे मांडत आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात महिला उमेदवार निर्भीडपणे निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या.त्यानंतर निवडणुकीत विजयी होऊन यातील काहीजणी आता थेट गावच्या गावकारभारीण बनल्या. तर बºयाच महिला ग्रामपंचायत सदस्यपदी काम करू लागल्या आहेत. तालुक्यातील ४६ महिला सरपंच आणि ११ महिला उपसरपंचांपैकी बºयाच महिला केवळ रबरी शिक्का बनवल्या गेल्या आहेत.त्यांच्या पतीराजांचे ग्रामपंचायत कार्यालयात स्वत: सरपंच असल्याचे समजून वावरणे, सरपंच खुर्चीवर अतिक्र मण करणे, नागरिकांना स्वत: उत्तरे देणे, ग्रामसेवकांना धारेवर धरणे, तालुक्याला स्वत: जाऊन सरकारी कार्यालयात उठ-बस करणे अशी त्यांची कामे सुरू आहेत. पत्नी सरपंच असतांनाही पतीराजांचे व्हॉटस अ‍ॅप स्टेट्सवर सरपंच उल्लेख असतो. महिला सरपंचांनी गावाच्या विकासासाठी स्वत: कामकाज करावे अशी नागरिकांची भावना आहे. अनेकदा महिलांचे कामकाज त्यांचे पतीराज करताना पहायला मिळत आहे.चौकट...नुकत्याच शिर्र्डी येथील महाराष्ट्र शासन आयोजित सरपंच मेळाव्यात निम्मे सरपंच पती अर्थात एसपी यांनी पत्नीला डावलून हजेरी लावली. त्यामुळे ग्रामविकासामध्ये चांगले योगदान देण्याची क्षमता असूनही महिला सरपंचांची परवड वाढली आहे.प्रतिक्रि या.....ज्या रणरागिणी कुटुंबाला उन्नत करू शकतात त्या गावाला वेगाने पुढे नेऊ शकतात. त्यांच्या कार्यकुशलतेचा उपयोग ग्रामविकास साधण्यासाठी व्हावा. पतीराजांनी त्यांच्या सामर्थ्याला ओळखून त्यांचे नेतृत्वगुण विकसित करायला हवे.- रमण आडोळे, महिला सरपंच टाके घोटी.सरपंच महिलेशिवाय इतरांनी कारभारात हस्तक्षेप करणे कायद्याने गैर आहे. महिलांना ग्रामविकास साधण्यासाठीचे तंत्र अवगत आहे. पतीराजांनी त्यांना त्यांचेकडील नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व विकसित करण्यासाठी स्वातंत्र्य द्यायला हवे.- भरत वेंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी, इगतपुरी.महिलांना सत्तेत वाटा देण्याचा शासनाचा हेतू आहे. सरपंच महासंघाची भूमिका महिलांनी कुशलतेने कार्य करावे अशीच आहे. वेळोवेळी होणाºया समन्वयामध्ये आमच्याकडून ह्या बाबी प्रकर्षाने चर्चेत आणल्या जातात. पुरु षांनी महिला लोकप्रतिनिधींच्या पंखात बळ भरावे.- हरिश्चंद्र चव्हाण, सरपंच, महासंघ पदाधिकारी.