शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

‘त्याची’ पाहूनी रुग्णसेवा, वाटे कोणालाही हेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:18 IST

नाशिक : मनुष्य संवेदनशील असला तरच त्याला समाजातील वेदना समजतात. केवळ वेदना समजणे उपयोगाचे नसून त्यासाठी आत्मीय कळवळा व ...

नाशिक : मनुष्य संवेदनशील असला तरच त्याला समाजातील वेदना समजतात. केवळ वेदना समजणे उपयोगाचे नसून त्यासाठी आत्मीय कळवळा व सामाजिक भानदेखील तितकेच महत्त्वाचे असते. याच जातकुळीतल्या मालेगावातील एका मुस्लीम युवकाने जातिभेदाच्या पलिकडे जाऊन वीस वर्षांपासून समाजकार्यात आपला ठसा उमटविला आहे, त्याचे नाव आहे...शफिक अहमद मोहम्मद रफिक शेख.

‘परजीवास्तव जेथ आंतडे कळवळुनी येई, त्या हृदयाविण स्वर्ग दुजा या ब्रह्मांडी नाही’ या बालकवींच्या ओळींची प्रचिती मालेगावमध्ये आली. वर्ष होते, २००५ चे. पती-पत्नी व दोन मुले लग्नसोहळा आटोपून दुचाकीने परत येत होते. पदर दुचाकीत अडकल्याने रस्त्यावर पडलेली महिला व दोन मुले पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडले गेले. अंगावर शहारे आणणारे ते दृश्य पाहून गलबलून गेलेल्या शफिक शेख यांनी क्षणाचाही विलंब न करता ते मृतदेह लिंबाच्या पानांनी झाकले. त्यांना रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांनी आपण आजपासून भेदभावाच्या शृंखला तोडून लोकांच्या सुखदु:खात सहभागी व्हायचे, असा निश्चय केला. ती दुर्दैवी घटनाच त्यांना सामाजिक कार्यात वाहून घेण्यासाठी निमित्तमात्र ठरली. त्याचदरम्यान शेख रेल्वेने मुंबईकडे जात असताना त्यांनी दोन इसमांना बसण्यासाठी जागा दिली. रेल्वे इगतपुरीत थांबल्यानंतर लोकांनी त्या दोन जणांचा सत्कार केला. सत्काराचे कारण विचारल्यावर आम्ही भ्रष्टाचार निर्मूलन अभियानच्या माध्यमातून सामाजिक काम करतो, असे सय्यद साबीर आणि संजीवकुमार यांनी सांगितले. शफिक यांना त्यांचा हेवा वाटल्याने अशाच प्रकारचे काम करण्याची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली. त्यांनी शफिक यांना नांदेडला बोलावून अभियानाचा सदस्य बनवून घेतले. शफिक यांना या पदामुळे बळ मिळाले. सुरुवातीपासून त्यांना करप्शनविषयी प्रचंड राग होता. कोणी लाच मागितली असे जर त्यांच्याजवळ कोणी सांगितले तर लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोशी ते संपर्क साधायचे. १६ ते १७ लाचखोरांना त्यांनी सापळे लावून पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. करप्शनविरोधातील हे काम पाहून लोकांनी त्यांना शफिक शेखचा ‘शफिक ॲण्टिकरप्शन’ कधी बनवून टाकले हे त्यांनाही कळले नाही. तेव्हापासून संपूर्ण मालेगाव त्यांना याच नावाने ओळखू लागले. यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीच्या समस्या, गरजूंना रेशनकार्ड काढून देणे, शंभर अपंग लोकांना लाेकवर्गणीतून सायकलींचे वाटप व आठ हजार लोकांना सरकारी शुल्कात वाहन परवाना काढून देण्याचे कामही सुरूच होते. शफिकचा उत्साह आणि योगदान पाहून अभियानाची जिल्हास्तरीय व नंतर महाराष्ट्र उपाध्यक्षपदापर्यंत बढती झाली. या सामाजिक कार्याची पावती म्हणून लोकांनी त्यांच्या पत्नीला महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून दिले. कालांतराने टिपू सुलतान यांचे वंशज साहेबजादा मन्सूर अली यांच्याशी भेट झाली. शफिकच्या सामाजिक कामाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचलेली होती. त्यांनी त्यांच्या ‘तहरीक के खुदादाद’ या संघटनेत काम करण्याची विचारणा करून प्रदेशाध्यक्ष बनविले. दोन संघटनांवर काम करीत असताना कामाला वेग आलेला होता. २००९ मध्ये सामान्य रुग्णालय सुरू झाले. मृतदेहांना आणण्यात अडचणी येत असल्याने लोकवर्गणी जमा करून रुग्णवाहिकेची खरेदी केली. ती रुग्णालयात उभी करून शहरातील सर्व पोलीस स्टेशनला संपर्क क्रमांक देऊन मृतदेहांची मोफत आणण्याची सेवा सुरू केली. आतापर्यंत शफिक यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून आत्महत्या, जळीत, पाण्यात बुडालेले पाच हजार मृतदेह आणण्याचे काम केले आहे. इतकेच नव्हे; तर मृतदेहांना लागणारे प्लास्टिक व कापडसुद्धा ते माेफत पुरवित आहेत.

इन्फो...

कुटुंबीयांनी पाठ फिरविलेल्या नऊ जणांवर केले अंत्यसंस्कार

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगावमधील जो पहिला बळी गेला, त्याचा मृतदेह शफिकनेच उचलला होता. लोकांमध्ये आजाराविषयी प्रचंड प्रमाणात भीती होती, अशावेळी रुग्णांना घरून रुग्णालयापर्यंत नेण्याचे काम तसेच अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी शहरातील दोन हजार रुग्णांना रुग्णालयात पोहोच केले. मृतांची संख्या वाढल्यावर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयसुद्धा पुढे येत नव्हते. अशा ९ जणांवर तसेच अन्य २७ ते २८ मृतांवर अंत्यसंस्कार करून शफिक शेख यांनी सामाजिक भान जपले होते.

110921\11nsk_44_11092021_13.jpg

शफिक शेख