शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या चक्का जाममुळे प्रवाशांचे हाल

By admin | Updated: December 17, 2015 23:01 IST

आंदोलन : सिन्नर, येवला, लासलगाव, पेठ, इगतपुरी, सटाणा येथे विद्यार्थ्यांची गैरसोय

 नाशिक : औद्योगिक कलह कायदा १९४८ मधील तरतुदीनुसार कामगार करार मोडीत काढण्यात यावा व एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी यासह अन्य आठ न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) ने पुकारलेल्या बेमुदत संपला एस.टी. कर्मचाऱ्यांच्या अन्य कास्ट्राईब संघटना, कामगार संघटना, सेना यांच्याशी संलग्न असणारे कर्मचारी येवल्यात कामगार हितासाठी या बेमुदत संपात स्वयंंस्फूर्तीने सहभागी होऊन त्यांनी एल्गार पुकारला व उत्स्फूर्त काम बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी केले. त्यामुळे गुरु वारी पहाटेपासून येवला आगारातून एकही बस रस्त्यावर येऊ शकली नाही. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१२ नंतर नियमित वेतनश्रेणीत येताना १३ टक्के कराराचा फायदा देण्यात यावा, सन २००० ते २०१२ पर्यंत ज्या कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केली आहे त्यांना नियमित वेतनश्रेणी द्यावी, चालक-वाहक यांचे ड्यूटी अलोकेसन संगणकीकृत करून टी-९ रोटेशनची अंमलबजावणी करण्यात यावी, चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांकरिता संगणकीकृत रजा व्यवस्थापक लागू करावा, वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात, महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार सोयीसवलती द्याव्यात या मागण्यांसाठी एस. टी. कर्मचारी संपात उतरले आहेत. येवल्यात काम बंदगुरुवारी सकाळी येवला बस आगाराचे चालक-वाहक आणि यांत्रिक अशा २४१ कर्मचाऱ्यांनी बस आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्रित येऊन काम बंद केले व घोषणा द्यायला सुरुवात केली. दरम्यान, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे आपल्या पोलीस ताफ्यासह बस आगारात आले. परंतु न्याय्य मागण्यांसाठी असलेल्या लढ्यात कर्मचारी असल्याने त्यांनी शांततामय मार्गाने आपले आंदोलन करण्याचे आवाहन केले. दरम्यान, प्रवाशांना याची फारशी कल्पना नसल्याने प्रवाशांची बसस्थानकात मोठी गर्दी झाली होती. बसेस आगाराच्या बाहेर येण्याची कोणतीच चिन्हे प्रवाशांना दिसेना. दरम्यान, एस.टी.चे वाहक, चालक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बसेस ताब्यात घेण्यास प्रशासनास नकार दिला व हे कर्मचारी थेट बसस्थानकात आले. कामानिमित्त बाहेरगावी जाणे गरजेचे असलेल्या प्रवाशांनी खासगी वाहनांनी जाणे पसंत केले. दुपारी १२.३० च्या सुमारास सुरेश गोंधळी, राजेश भंडारी, प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, राजेश गणोरे यांनी कर्मचाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र दिले व आगारप्रमुख उत्तमराव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. (लोकमत चमू)