शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

बसच्या चक्का जाममुळे प्रवाशांचे हाल

By admin | Updated: December 17, 2015 23:01 IST

आंदोलन : सिन्नर, येवला, लासलगाव, पेठ, इगतपुरी, सटाणा येथे विद्यार्थ्यांची गैरसोय

 नाशिक : औद्योगिक कलह कायदा १९४८ मधील तरतुदीनुसार कामगार करार मोडीत काढण्यात यावा व एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी यासह अन्य आठ न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) ने पुकारलेल्या बेमुदत संपला एस.टी. कर्मचाऱ्यांच्या अन्य कास्ट्राईब संघटना, कामगार संघटना, सेना यांच्याशी संलग्न असणारे कर्मचारी येवल्यात कामगार हितासाठी या बेमुदत संपात स्वयंंस्फूर्तीने सहभागी होऊन त्यांनी एल्गार पुकारला व उत्स्फूर्त काम बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी केले. त्यामुळे गुरु वारी पहाटेपासून येवला आगारातून एकही बस रस्त्यावर येऊ शकली नाही. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१२ नंतर नियमित वेतनश्रेणीत येताना १३ टक्के कराराचा फायदा देण्यात यावा, सन २००० ते २०१२ पर्यंत ज्या कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केली आहे त्यांना नियमित वेतनश्रेणी द्यावी, चालक-वाहक यांचे ड्यूटी अलोकेसन संगणकीकृत करून टी-९ रोटेशनची अंमलबजावणी करण्यात यावी, चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांकरिता संगणकीकृत रजा व्यवस्थापक लागू करावा, वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात, महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार सोयीसवलती द्याव्यात या मागण्यांसाठी एस. टी. कर्मचारी संपात उतरले आहेत. येवल्यात काम बंदगुरुवारी सकाळी येवला बस आगाराचे चालक-वाहक आणि यांत्रिक अशा २४१ कर्मचाऱ्यांनी बस आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्रित येऊन काम बंद केले व घोषणा द्यायला सुरुवात केली. दरम्यान, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे आपल्या पोलीस ताफ्यासह बस आगारात आले. परंतु न्याय्य मागण्यांसाठी असलेल्या लढ्यात कर्मचारी असल्याने त्यांनी शांततामय मार्गाने आपले आंदोलन करण्याचे आवाहन केले. दरम्यान, प्रवाशांना याची फारशी कल्पना नसल्याने प्रवाशांची बसस्थानकात मोठी गर्दी झाली होती. बसेस आगाराच्या बाहेर येण्याची कोणतीच चिन्हे प्रवाशांना दिसेना. दरम्यान, एस.टी.चे वाहक, चालक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बसेस ताब्यात घेण्यास प्रशासनास नकार दिला व हे कर्मचारी थेट बसस्थानकात आले. कामानिमित्त बाहेरगावी जाणे गरजेचे असलेल्या प्रवाशांनी खासगी वाहनांनी जाणे पसंत केले. दुपारी १२.३० च्या सुमारास सुरेश गोंधळी, राजेश भंडारी, प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, राजेश गणोरे यांनी कर्मचाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र दिले व आगारप्रमुख उत्तमराव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. (लोकमत चमू)