शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पक्षांना बंडखोरी भोवणार !

By admin | Updated: February 16, 2017 23:12 IST

वीरगाव गट : अंतिम चरणात चुरस; वातावरण तापले

नितीन बोरसे सटाणाबागलाण तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वाढत्या उन्हाबरोबरच राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले असतांना वीरगाव गटात मिनी मंत्रालयात जाण्यासाठी आदिवासी महिलांमध्ये आदळआपट सुरू झाली असून, ऐन निवडणुकीत केलेले पक्षांतर आणि नाराजांनी बंडाचे निशाण फडकविल्याने येथे सर्वच पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात या पंचरंगी सामन्यात चुरस निर्माण झाली आहे.वीरगाव गट हा तसा कॉँग्रेसचाच बालेकिल्ला राहिला आहे; मात्र माजी मंत्री स्व. डॉ. दौलतराव अहेर यांच्या प्रभावामुळे या गटावर तब्बल एक दशक भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यांनतर माजी आमदार स्व.पंडितराव धर्माजी पाटील यांच्या स्नुषा व माजी सभापती यशवंत पाटील यांच्या सौभाग्यवती संगीता यांनी हा गट पुन्हा काबीज केला. एक दशकापासून हा गट आता कॉँग्रेसच्या ताब्यात आहे. कॉँग्रेसने हा गट कायम राखण्यासाठी पंचायत समितीच्या माजी सभापती सीताबाई बागुल यांना उमेदवारी देऊन जबाबदारी टाकली आहे. सीताबाई बागुल या पहिल्या महिला पंचायत समिती सभापती म्हणून निवडून आल्या होत्या. कालांतराने त्या नाशिकला स्थायिक झाल्यामुळे त्यांचे दर्शन देवदुर्लभ असून त्यांना कॉँग्रेसचा गड राखण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.भाजपने गेल्या आमदारकीच्या निवडणुकीत चीत झालेल्या शिवसेनेच्या उमेदवार साधना गवळी यांना आयात करून उमेदवारी बहाल केली. यामुळे भाजपाच्या निष्ठावंत दुखावले गेल्याने त्यांनी सेनेची वाट धरली. नाराज भाजपा कार्यकर्त्यांनी स्वतंत्र मोट बांधून आदर्शगाव किकवारीच्या सरपंच मंजुळाबाई कैलास जहागीरदार (सोनवणे ) यांच्या हातात ऐनवेळी सेनेचे धनुष्यबाण दिले. भाजपामध्ये उमेदवारी लादल्याने नाराजी असताना राष्ट्रवादी मध्येही या पेक्षा वेगळे चित्र नाही. राष्ट्रवादी मध्ये तिकीट मिळविण्यापासूनच मारामारी सुरु होती. पंचायत समितीचे विद्यमान राष्ट्रवादीचे सदस्य वीरेश घोडे यांनी पत्नी वंदना यांच्यासाठी दावेदारी केली होती; मात्र पक्षातीलच काही मंडळीने त्यांना विरोध करून जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभापती व देवळ्याच्या रहिवासी उषा बच्छाव यांना उमेदवारीसाठी एकप्रकारे पायघड्या घातल्या. बच्छाव यांनाही सोयीचा गट नसल्यामुळे त्या राजी होऊन उमेदवारी माळ अलगद त्यांच्या गळ्यात पडली. यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी मोट बांधून आपली क्षमता सिद्ध करण्याचा विडा उचलला आहे. वीरगाव गटात वंदना घोडे यांना अपक्ष मैदानात उतरवून बंडाचे निशाण फडकावले आहे. उमेदवारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या मिनी मंत्रालयाच्या लढाईत अपक्षांसह सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निवडणुकीच्या अंतिम चरणात चुरस निर्माण झाली आहे. एकंदरीत नाशिक स्थायिक सीताबाई बागुल यांना कॉँग्रेसने आपला गड शाबूत ठेवण्याचे शिवधनुष्य दिले आहे. तर शिवसेनेच्या मंजुळाबाई जहागीरदार धनुष्यबाण घेऊन आमदारकीच्या लढाईत पराभूत झालेल्या साधना गवळी निवडून येतात की राष्ट्रवादीच्या उषा बच्छाव यांना मतदार मतांचे दान करतात, हे येणारा काळच ठरविणार आहे.