शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यातील शेतकरी संपात सहभागी

By admin | Updated: June 2, 2017 00:16 IST

विविध मागण्यांप्रश्नी संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला

 लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : राज्यव्यापी शेतकरी संप आंदोलनात तालुक्यातील शेतकरी सहभागी झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुमारे ६१ लाख १२ हजार ३०० रुपयांची उलाढाल बंद झाली होती, तर कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासाठी विविध मागण्यांप्रश्नी संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.आंदोलन सुरू असताना नांदगाव येथे आंबे विक्रीसाठी जात असलेल्या व्यापाऱ्यांना तालुक्यातील निमगाव येथे अडवून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे आंबे रस्त्यावर फेकून देण्यात आल्याची घटना घडली आहे. सातबारा उतारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळावा, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव द्यावा, शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठा करावा, ठिबक व तुषार सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान द्यावे, जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग रद्द करावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मालेगाव तालुका किसान क्रांती प्रचार समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी या संपात सहभाग नोंदवला आहे.गुरुवारी मध्यरात्रीपासूनच शेतकऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे बाजार समितीतील सुमारे ६१ लाख १२ हजार ३०० रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बाजार समितीतील भुसार माल शेंगा, कांदा, भाजीपाला व दूध यातील दररोजची आर्थिक उलाढाल आज ठप्प झाली होती. आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शुकशुकाट जाणवत होता. दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मसगा महाविद्यालयाच्या मैदानावरून प्रारंभ झालेला मोर्चा कॉलेजरोडमार्गे तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनाबाहेर काही काळ ठिय्या आंदोलन केले. यावेळी डॉ. एस.के. पाटील, शेखर निकम यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.