शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

१ जूनपासून शेतकरी संपात सहभागी

By admin | Updated: May 29, 2017 00:24 IST

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. संपावर जाण्याबाबतचे निवेदन व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीचा ग्रामसभेचा ठराव शेतकऱ्यांनी आमदार व तहसीलदारांकडे सुपूर्द केला.  गेल्या काही वर्षांत पाठोपाठ आलेल्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीतून ठोस उत्पादन घेता आले नाही. उपलब्ध पाण्यावर उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे शेतीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करणेही अवघड झाले आहे. कर्जाचा बोजा वाढत असून, वसुलीसाठी बॅँकांनी शेतकऱ्यांवर सक्ती सुरू केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कौटुंबिक, सामाजिक जीवनात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविण्यास प्रारंभ केल्याचे निवेदनात म्हटले आहे. शेतकरी आत्महत्येच्या घटनांमुळे गाव पातळीवरील सामाजिक वातावरण बिघडले आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफी दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकरी शासनाकडून कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय शासनाने तातडीने घेतल्यास गावपातळीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची हमी आम्ही घेऊ, असेही निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १ जूनपासून पुकारलेल्या संपात आम्ही सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी सरपंच वनीता कापडी, सुभाष बर्के, चिंधू डोमाडे, शरद कापडी, अशोक कर्डक, बाळू कापडी, बी. एन. कापडी, मधुकर कापडी, अशोक डोमाडे, बाळू कापसे आदींसह शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन ७/१२ कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, दूधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव मिळावा, शेतीसाठी अखंडित व मोफत वीज ाुरवठा करावा, ठिबक व तुषार सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान मिळावे आदी मागण्यांचा ठराव देशवंडी ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे.