शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

१२ हजार विद्यार्थ्यांची भाग दोन प्रक्रिया पूर्ण

By admin | Updated: June 20, 2017 01:35 IST

अकरावी : आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियांतर्गत आत्तापर्यंत सुमारे १२ हजार २१ विद्यार्थ्यांनी भाग दोन भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, भाग एकमधील प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २६ हजार ४० पर्यंत पोहोचली आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी भाग एकची पडतळणी करून न घेताच भाग दोन भरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अडचणी येत असून, ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण होत आहे, त्यांनी संबंधित भागासाठी नियोजित मार्गदर्शन केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी काही विद्यार्थी थेट भाग दोन भरण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा विद्यार्थ्यांना भाग १ ची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय भाग दोन भरता येणार नाही. तर पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिकांमधील माहिती भरताना चुका करीत असल्याने त्यांनी शाळा, महाविद्यालयांमधील सुविधा केंद्र अथवा मार्गदर्शन कें द्रावर संपर्क साधून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकांचा सखोल अभ्यास करून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यास त्यांनी मार्गदर्शन केंद्रावरून मदत मिळवून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत २६ हजार ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जातील भाग १ भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यापैकी २२ हजार ७०६ विद्यार्थ्यांच्या अर्जांची कनिष्ठ महाविद्यालये अथवा शाळास्तरावर पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अर्जाची पडताळणी करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत १२ हजार २१ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचा भाग दोन भरण्याची प्रक्रियाही पूर्ण केली आहे. मंगळवारी प्राचार्यांची बैठकअकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या प्राचार्यांची नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी प्राचार्यांना अल्पसंख्याक, इनहाउस, तंत्रशिक्षण व व्यवस्थापन कोट्याच्या आरक्षणांनुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.