शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

पालकांना चांगलाच आर्थिक भुर्दंड बसणार

By admin | Updated: May 3, 2015 02:04 IST

पालकांना चांगलाच आर्थिक भुर्दंड बसणार

नाशिक : संस्थाचालकांसमोर लोटांगण घालत सरकारने शिक्षण हक्क कायद्यानुसार देण्यात येणाऱ्या २५ टक्के आरक्षणातून पूर्वप्राथमिकच्या (नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी) वर्गांना वगळल्याने पालकांना चांगलाच आर्थिक भुर्दंड बसणार आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पहिल्या प्रवेश फेरीत ७५ टक्के प्रवेश पूर्वप्राथमिकचे असल्याने पालकांना हजारो रुपयांचे प्रवेश शुल्क सोसवणार काय? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार १७११ जागांपैकी २ मेपर्यंत ४९९ विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रवेश दिले. त्यातील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी पूर्वप्राथमिक वर्गातील आहेत. मात्र, सरकारने ऐनवेळी मुजोर संस्थाचालकांचा हट्ट पूर्ण करीत अध्यादेश काढून पूर्वप्राथमिक वर्गांना शिक्षण हक्क कायद्यातून वगळल्याने वंचित आणि दुर्बल घटकातील पालकांसमोर शाळेचे हजारो रुपयांचे शुल्क भरणे किंवा शाळा सोडणे, असे दोनच पर्याय शिल्लक राहिले आहेत.शहरातील बहुतेक शाळा पूर्वप्राथमिक वर्गापासून सुरू होतात. त्यामुळे वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होते त्या वर्गापासून जागा राखीव ठेवण्याची तरतूद राज्याच्या अध्यादेशात करण्यात आली होती. त्यानुसार २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशही निश्चित करण्यात आले. मात्र, सरकारने ऐनवेळी पूर्वप्राथमिक वर्गांना या कायद्यातून वगळल्याचा अध्यादेश जारी करीत आतापर्यंत देण्यात आलेले प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांची चांगलीच परवड होणार आहे. शहरातील काही संस्थांमध्ये पूर्वप्राथमिक वर्गांसाठी ५० हजारांपेक्षा अधिक शुल्क आकारले जाते. त्यामुळे पालकांना हा भुर्दंड सोसवणार काय? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. (प्रतिनिधी)