शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पालकांना चांगलाच आर्थिक भुर्दंड बसणार

By admin | Updated: May 3, 2015 02:04 IST

पालकांना चांगलाच आर्थिक भुर्दंड बसणार

नाशिक : संस्थाचालकांसमोर लोटांगण घालत सरकारने शिक्षण हक्क कायद्यानुसार देण्यात येणाऱ्या २५ टक्के आरक्षणातून पूर्वप्राथमिकच्या (नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी) वर्गांना वगळल्याने पालकांना चांगलाच आर्थिक भुर्दंड बसणार आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पहिल्या प्रवेश फेरीत ७५ टक्के प्रवेश पूर्वप्राथमिकचे असल्याने पालकांना हजारो रुपयांचे प्रवेश शुल्क सोसवणार काय? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार १७११ जागांपैकी २ मेपर्यंत ४९९ विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रवेश दिले. त्यातील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी पूर्वप्राथमिक वर्गातील आहेत. मात्र, सरकारने ऐनवेळी मुजोर संस्थाचालकांचा हट्ट पूर्ण करीत अध्यादेश काढून पूर्वप्राथमिक वर्गांना शिक्षण हक्क कायद्यातून वगळल्याने वंचित आणि दुर्बल घटकातील पालकांसमोर शाळेचे हजारो रुपयांचे शुल्क भरणे किंवा शाळा सोडणे, असे दोनच पर्याय शिल्लक राहिले आहेत.शहरातील बहुतेक शाळा पूर्वप्राथमिक वर्गापासून सुरू होतात. त्यामुळे वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होते त्या वर्गापासून जागा राखीव ठेवण्याची तरतूद राज्याच्या अध्यादेशात करण्यात आली होती. त्यानुसार २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशही निश्चित करण्यात आले. मात्र, सरकारने ऐनवेळी पूर्वप्राथमिक वर्गांना या कायद्यातून वगळल्याचा अध्यादेश जारी करीत आतापर्यंत देण्यात आलेले प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांची चांगलीच परवड होणार आहे. शहरातील काही संस्थांमध्ये पूर्वप्राथमिक वर्गांसाठी ५० हजारांपेक्षा अधिक शुल्क आकारले जाते. त्यामुळे पालकांना हा भुर्दंड सोसवणार काय? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. (प्रतिनिधी)