शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

पालकांना वेळापत्रकाची प्रतिक्षा ; आरटीईच्या संकेतस्थळावर सूचना नसल्याने सांशकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:34 IST

आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के  जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत ३० मार्चलाच संपली आहे. त्यानंतर जवळपास आठवडाभराचा कालावधी उलटत आला तरी प्रवेश पक्रियेचे पुढील वेळापत्रक अद्यापही जाहीर झालेले नाही. त्याचप्रमाणे पहिल्या सोडतीविषयीही कोणतीही सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करणाऱ्या पालकांची सोडतीविषयी उत्कंठा शिगेला पोहचली असून सोडत लांबत असल्याने प्रवेश प्रक्रियेविषयी साशंकता निर्माण होऊ  लागली आहे. 

ठळक मुद्देआरटीई प्रेवश प्रक्रियेच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा पहिली सोडत लांबल्याने पालकांमध्ये साशंकता

नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के  जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत ३० मार्चलाच संपली आहे. त्यानंतर जवळपास आठवडाभराचा कालावधी उलटत आला तरी प्रवेश पक्रियेचे पुढील वेळापत्रक अद्यापही जाहीर झालेले नाही. त्याचप्रमाणे पहिल्या सोडतीविषयीही क ोणतीही सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करणाऱ्या पालकांची सोडतीविषयी उत्कंठा शिगेला पोहचली असून सोडत लांबत असल्याने प्रवेश प्रक्रियेविषयी साशंकता निर्माण होऊ  लागली आहे. आरटीई अंतगर्गत प्रवेशासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी एकूण १४ हजार ९९५ अर्ज प्राप्त झाले असून आतापर्यंत संकेतस्थळावर पुढील प्रक्रियेविषयी कोणतीही सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी आपल्या पाल्याचा अर्ज दाखल करणाºया पालकांना पहिल्या सोडतीसह वेळापत्रकाची प्रतीक्षा लागली आहे. आरटीई अंतर्गत अर्ज करण्यासाठी शिक्षण विभागाने पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी वयोमर्यादेतही वाढ करून २२ मार्चपर्यंत मुदत आठ दिवस वाढवून ३० मार्च केली होती. या वाढीव मुदतीत जवळपासून २ हजार अर्ज दाखल करण्यात आले. ५ हजार ७६४ जागांसाठी यंदा तब्बल पट म्हणजे १४ हजार ९९५ अर्ज संकेतस्थळावर दाखल झाले आहे. अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून, केवळ ४६ अ‍ॅपद्वारे सादर झाले आहेत. दरम्यान, पहिलीच्या प्रवेशासाठी पूर्वनियोजित वयोमर्यादेत वाढ देण्यासोबतच शिक्षण विभागाने अर्ज सादर करण्यासाठी २२ मार्चची मुदत वाढवून ३० मार्च केली होती. प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठीची मुदत शनिवारी संपली असून, रविवारच्या सुटीनंतर सोमवारी (दि.१) सोडतीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पालकांना सोडतीची प्रतीक्षा लागली आहे. 

 नर्सरी प्रवेशासाठी अर्जांचा ढिग आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नाशिक जिल्'ात ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७६४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यात शहरातील केवळ दोन शाळांमध्ये नर्सरीच्या ३९ जागा उपलब्ध असून या दोन्ही शाळा शहरातील हायप्रोफाईल भागात आहे. असे असतानाही या शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी ढिगभर अर्ज दाखल झाले आहेत. यातील एकाच शाळेसाठी जवळपास ३ ते ४ हजार अर्ज दाखल झाले असून यातील बहूतांश अर्ज हे शाळेच्या एक किलोमीटर परिसराच्या परिघातील आहे. त्यामुळे आरटीईचे अर्ज दाखल करणारे खरोखर याच परिसरात राहतात का, आणि या परिसरात भाडे कराराने राहणारे पालकांचे आर्थिक उत्पन्न आरटीईच्या पात्रता निकषांमध्ये बसते का असे सवाल आरटीईच्या पात्र लाभार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहेत.