शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेतील शिक्षणाने संस्कारक्षम विद्यार्थी घडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:44 IST

सिन्नर : चांगले काय हे समजल्याशिवाय चांगले घडत नाही. मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेची गरज आहे. मात्र मातृभाषेतील शिक्षणाने संस्कारक्षम विद्यार्थी घडत असतात. त्यामुळे नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेचे मराठी बळकटीकरणाचे काम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील चांडक कन्या विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील : चांडक कन्या विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटनचांडक कन्या विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

सिन्नर : चांगले काय हे समजल्याशिवाय चांगले घडत नाही. मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेची गरज आहे. मात्र मातृभाषेतील शिक्षणाने संस्कारक्षम विद्यार्थी घडत असतात. त्यामुळे नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेचे मराठी बळकटीकरणाचे काम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील चांडक कन्या विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर उद्योजक राधाकिसन चांडक, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक, उपाध्यक्ष अ‍ॅड. नागनाथ गोरवाडकर, डॉ. सुनील कुटे, सिन्नर संकुल प्रमुख श्रीपाद देशपांडे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, वैशाली गोसावी आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.चांगले शिक्षण मातृभाषेतून झाले पाहिजे, त्यातून मातीतले भावविश्व समृद्ध होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांमध्ये चांगल्या इमारती उभ्या राहतात. ज्ञानाची भूकही इंटरनेटवरूनही भागवता येते. मात्र त्यातून पुस्तकी ज्ञान असलेले साचेबद्ध विद्यार्थी तयार होतात. मात्र संस्कार करणारे, चांगले आणि वाईटाला फरक समजावणारे व जीवनमूल्य शिकविणारे शिक्षक गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. जीवनमूल्य शिकविणाऱ्या संस्था व शिक्षकांची समाजाला गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक यांनी संस्थेच्या शतकीय वाटचालीचा आढावा घेतला. माधवी पंडित यांनी सूत्रसंचालन केले. श्रीपाद देशपांडे यांनी आभार मानले. ज्ञानदानाचे कार्यउद्योजक राधाकिसन चांडक यांनी संस्थेच्या कार्याचा उल्लेख करताना आणखी १० लाख रुपयांची देणगी घोषित केली. डॉ. विनायक गोविलकर यांनी संस्था संस्कारक्षम, सदृढ वातावरणात ज्ञानदानाचे कार्य करत असल्याचे सांगून सिन्नरकरांनी त्यास बळ द्यावे, असे आवाहन केले.