शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

भरेकऱ्यांचा समांतर बाजार : ‘ शेतातील माल थेट ग्राहकांच्या घरात’ उद्देशाला हरताळ शेतकरी आठवडे बाजाराला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:03 IST

नाशिक : ग्राहकांना शेतातील शेतमाल थेट आणि स्वस्त मिळावा यासाठी गेल्या डिसेंबर महिन्यात शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रत्यावरील पांजरापोळच्या जागेत सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला अवघ्या चारच महिन्यांत अवकळा आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी आठवडे बाजार बंद होण्याच्या मार्गावर आठवडे बाजारात केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी

नाशिक : ग्राहकांना शेतातील शेतमाल थेट आणि स्वस्त मिळावा यासाठी गेल्या डिसेंबर महिन्यात शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रत्यावरील पांजरापोळच्या जागेत सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला अवघ्या चारच महिन्यांत अवकळा आली आहे. भरेकºयांनी या बाजाराला प्रथमपासून विरोध करीत सातत्याने बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याने बाजाराच्या अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण झाला होता. आता भरेकºयांनी या बाजाराच्या जवळच महापालिकेच्या मोकळ्या जागेत आठवडे बाजार सुरू केल्याने शासनाचा शेतकरी आठवडे बाजार बंद होण्याच्या मार्गावर आला आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यात येतो. दर शुक्रवारी भरणाºया या बाजारात ग्राहकांना थेट शेतातील माल उपलब्ध होत असल्याने ग्राहकांच्या या बाजारावर उड्या पडत होत्या. आठवडे बाजारात केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी दिली जाते. १० ते २० शेतकºयांनी गट तयार करून पणन मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. याशिवाय पांजरपोळ कोणतेच शुल्क आकारत नाही. या नोंदणीची संख्याही आता कमी झाल्याने नवीन शेतकरी सदस्य निर्माण झालेले नाही. त्यातच पूर्वीच्या नोंदणीकृत शेतकºयांनीदेखील शेतकरी आठवडे बाजारात बसणे परवडत नसल्याचे म्हटल्याने शेतकरी आठवडे बाजाराचे भवितव्य धोक्यात आले आहे. शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विनामध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध होत असल्याने ग्राहकांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला होता. ग्राहकांनी एकीकडे बाजाराची संकल्पना स्वीकारली असताना दुसरीकडे शेतकरी बाजार सुरू झाल्यापासून स्थानिक भरेकºयांनी बाजार बंद पाडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. स्थानिक भरेकºयांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा दावा करीत या भरेकºयांनी शेतकरी आठवडे बाजारात शिरून दोनदा बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तर त्यानंतर त्यांनी शेतकरी बाजाराच्या बाजूलाच रस्त्यावर दुकाने थाटल्यामुळे त्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी पांजरापोळ, महापालिका आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. अतिक्रमण विभागाचे वाहन वारंवार तैनात करावे लागत होते.