शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

भरेकऱ्यांचा समांतर बाजार : ‘ शेतातील माल थेट ग्राहकांच्या घरात’ उद्देशाला हरताळ शेतकरी आठवडे बाजाराला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:03 IST

नाशिक : ग्राहकांना शेतातील शेतमाल थेट आणि स्वस्त मिळावा यासाठी गेल्या डिसेंबर महिन्यात शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रत्यावरील पांजरापोळच्या जागेत सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला अवघ्या चारच महिन्यांत अवकळा आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी आठवडे बाजार बंद होण्याच्या मार्गावर आठवडे बाजारात केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी

नाशिक : ग्राहकांना शेतातील शेतमाल थेट आणि स्वस्त मिळावा यासाठी गेल्या डिसेंबर महिन्यात शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रत्यावरील पांजरापोळच्या जागेत सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला अवघ्या चारच महिन्यांत अवकळा आली आहे. भरेकºयांनी या बाजाराला प्रथमपासून विरोध करीत सातत्याने बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याने बाजाराच्या अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण झाला होता. आता भरेकºयांनी या बाजाराच्या जवळच महापालिकेच्या मोकळ्या जागेत आठवडे बाजार सुरू केल्याने शासनाचा शेतकरी आठवडे बाजार बंद होण्याच्या मार्गावर आला आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यात येतो. दर शुक्रवारी भरणाºया या बाजारात ग्राहकांना थेट शेतातील माल उपलब्ध होत असल्याने ग्राहकांच्या या बाजारावर उड्या पडत होत्या. आठवडे बाजारात केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी दिली जाते. १० ते २० शेतकºयांनी गट तयार करून पणन मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. याशिवाय पांजरपोळ कोणतेच शुल्क आकारत नाही. या नोंदणीची संख्याही आता कमी झाल्याने नवीन शेतकरी सदस्य निर्माण झालेले नाही. त्यातच पूर्वीच्या नोंदणीकृत शेतकºयांनीदेखील शेतकरी आठवडे बाजारात बसणे परवडत नसल्याचे म्हटल्याने शेतकरी आठवडे बाजाराचे भवितव्य धोक्यात आले आहे. शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विनामध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध होत असल्याने ग्राहकांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला होता. ग्राहकांनी एकीकडे बाजाराची संकल्पना स्वीकारली असताना दुसरीकडे शेतकरी बाजार सुरू झाल्यापासून स्थानिक भरेकºयांनी बाजार बंद पाडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. स्थानिक भरेकºयांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा दावा करीत या भरेकºयांनी शेतकरी आठवडे बाजारात शिरून दोनदा बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तर त्यानंतर त्यांनी शेतकरी बाजाराच्या बाजूलाच रस्त्यावर दुकाने थाटल्यामुळे त्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी पांजरापोळ, महापालिका आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. अतिक्रमण विभागाचे वाहन वारंवार तैनात करावे लागत होते.