शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘आगे-पीछे हमारी सरकार, यहाँ के हम हैं राजकुमार!’ आदिवासी भागात समांतर सरकार, मतदान काय, सर्वच अमान्य 

By संजय पाठक | Updated: May 13, 2024 09:22 IST

यंदा लोकसभा निवडणुकीत तरी हे मतदान करतील काय, असा प्रश्न आहे. 

संजय पाठक, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. मात्र, नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील आदिवासी भागात एक समांतर सरकार अजूनही अस्तित्वात आहे, ‘एसी भारत सरकार! जानेवाले जरा होशीयार, यहां के हम है राजकुमार, आगे-पीछे हमारी सरकार’, या शम्मी कपूरच्या गाजलेल्या गाण्याची आठवण करून देणारे या सरकारचे अस्तित्व नाशिक जिल्ह्यात आहे. ब्रिटिशांनी आम्हाला सनद देऊन राज्य दिले आहे, त्यामुळे आम्हीच येथील जंगल जमिनीचे मालक, असा त्यांचा दावा असून, ते ना कोणत्या मतदान प्रक्रियेत भाग घेतात, ना सरकारचा कर भरतात! त्यामुळेच यंदा लोकसभा निवडणुकीत तरी हे मतदान करतील काय, असा प्रश्न आहे. 

लोकसभा निवडणूक राज्यात अखेरच्या टप्प्यात आहे. यादरम्यान, त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरीवर एसी सरकारचा एक फलक लागला आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली. फलक लावणाऱ्या अज्ञातांवर गुुन्हा दाखल करून पोलिसांनी संबंधितांचा शाेध सुरू केला आहे. मात्र, त्यात शोध घेण्यासारखे फारसे  काहीच नाही. कारण नाशिकच्या आदिवासी पट्ट्यातच ‘एसी भारत सरकार’चे उघडपणे समर्थन करणारी अनेक गावे आहेत.  

गुजरातच्या डांग जिल्ह्यात मुख्यालय  

नाशिक जिल्ह्यातील सुरगाण्याजवळ सीमारेषेवर गुजरातमधील डांग जिल्हा असून, तेथे या एसी सरकारचे मुख्यालय असल्याचे सांगितले जाते. केसरजी महाराज हे त्यांचे राजे होते, त्यांचे निधन झाल्याने आता त्यांचे पुत्र वारस म्हणून काम बघतात. सुरगाणा तालुक्यातील विजयनगर, दोरी पाडा, आमदारे, झुंडी पाडा, अशा अनेक लहान गावे किंवा पाड्यांवर एसी सरकारचे समर्थक आहेत. कळवण, पेठ, त्र्यंबकेश्वर, वणी, अशा अनेक ठिकाणी एसी सरकारचे समर्थक असल्याचे सांगितले जाते.

ना कर भरतात, ना लाभ घेतात... 

- माकपचे माजी आमदार जे.पी. गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार एसी सरकार समर्थकांची संख्या पाच हजार आहे. हे लोक मतदान करीत नाहीत. ते ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत नाहीत, की कोणत्याही प्रकारचा कर म्हणजेच ग्रामपंचायतीची घरपट्टीदेखील भरत नाहीत, सरकारी योजनांचाही लाभ घेत नाहीत.

शेषन कार्डलाही केला होता विरोध

- १९९० च्या दशकात तत्कालीन निवडणूक आयुक्त (कै.) टी.एन. शेषन यांनी ओळखपत्र देण्यास प्रारंभ केला होता.- त्यास या एसी भारत सरकारच्या कथित जनतेने नकार दिला होता. ए.सी. भारत सरकार केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून, गुजरातमधील डांग, गोव्यासह पाच राज्यांत एसी सरकारचे समर्थक असल्याचे समजते. 

सुरगाणा तालुक्यातील अशा प्रकारच्या पाड्यांची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी मतदान अधिकारी आणि पोलिस अधिकारी जाऊन आले आहेत; पण तेथील नागरिक फारसे बोलत नाहीत. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे काय, हेदेखील ते स्पष्ट बोलत नाहीत.   -शशिकांत मंगरुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी. 

टॅग्स :Nashikनाशिक