शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:58 IST

नाशिक : प्रीतिसुधाजी शिक्षण फंड, नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम स्तुत्य असून, भविष्यात आपण अशा उपक्रमासाठी सहाय्य करू, असे प्रतिपादन अशोका बिल्डकॉनचे संचालक अशोक कटारिया यांनी रविवारी (दि. ३०) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे झालेल्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक आणि कौशल्य पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी व्यक्त केले. जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक यांच्यातर्फे ...

नाशिक : प्रीतिसुधाजी शिक्षण फंड, नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम स्तुत्य असून, भविष्यात आपण अशा उपक्रमासाठी सहाय्य करू, असे प्रतिपादन अशोका बिल्डकॉनचे संचालक अशोक कटारिया यांनी रविवारी (दि. ३०) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे झालेल्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक आणि कौशल्य पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी व्यक्त केले. जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी पुढे बोलताना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मेळावे घेणार असल्याचीदेखील माहिती यावेळी दिली. या पुरस्कार प्रदान सोहळ्याअंतर्गत नाशिक जिल्हा जैन समाजातील इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त, बारावीमध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांसह सनदी लेखापाल, डॉक्टर, अभियंता आणि वकील अशा ७४ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले तसेच गरजू विद्यार्थ्यांना आठ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तींचेही वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऋ तुजा कांकरिया, राशी लोढा, पार्श्व दुगड, अनुजा बुरड, उत्सव राका, श्रेणिक नहार, मेहुल पारख, प्रेरणा जैन, वृषाली बोरा, रिद्धी कोठारी, सिद्धी पारख, भूषण ओस्तवाल, शुभम संघवी, करिश्मा पारख, ऐश्वर्या ब्रह्मेचा, प्रणीत भटेवरा, निकेत पारख, तेजस संचेती, सौरभ मोदी, दिनेश चोरडिया आदि विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, सुभाषचंद्र बाफणा, राजेंद्र बोरा, बसंतीलाल ललवाणी, मोतीवाल ओस्तवाल, डॉ. कन्हैयालाल कटारिया, रमेश साखला, चंपकलाल पारख, अरुण बुरड, स्वरूपचंद्र भंडारी, हेमंत बोथरा, अ‍ॅड. विद्युलता तातेड, लताबाई लोढा, प्रमिला पारख आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश कोठारी, सूत्रसंचालन लोकेश पारख, तर आभार मोहनलाल लोढा यांनी मानले. यावेळी जैन बांधव उपस्थित होते.धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचेरमणिकमुनीजी म.सा. यांनी मार्गदर्शन करताना प्रीतिसुधाजी शिक्षण फंड यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणारा उपक्रम स्तुत्य असून, भविष्यातही या प्रकारचे उपक्रम कायम राबवायला हवेत हे सांगताना जीवनात शिक्षणाला महत्त्व द्यायला हवे, असे आवाहन केले. जीवनात प्रत्येकाने साधू-संतांच्या दर्शनाचा तसेच व्याख्यानाचा लाभ घेतल्यास जीवनाची योग्य दिशा सापडते. मानवी जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असून, यामुळे आपल्याला सुख-शांती लाभत असल्याचे रमणिकमुनी म.सा. यांनी यावेळी सांगितले.