शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

खामखेडा परिसरातील शेतीला परगावच्या मजुरांचा हातभार

By admin | Updated: December 22, 2015 22:04 IST

खामखेडा परिसरातील शेतीला परगावच्या मजुरांचा हातभार

खामखेडा : परिसरात सर्वत्र उन्हाळी कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून, सर्वत्र मजूरटंचाई जाणवत असल्याने परगावच्या मजुरांकडून कामे करून घेतली जात आहेत.पूर्वी बागयती शेती मोजकी असल्याने गावातील स्थानिक मजुरांकडून शेतीची कामे करून घेतली जात असत. काही वेळेस स्थानिक मजुरांनाही कामे मिळत नसे. मात्र वीज आणि पीव्हीसी पाइपामुळे नदीपात्राचे पाणी शेतीसाठी उपयोगात आल्याने बागायती शेतीचा विकास झाला. शेती सपाटीकरण्यासाठी अत्याधुनिक अवजारांचा वापर होऊ लागला. त्यात जेसीबीसारखे यंत्र विकसित झाल्यामुळे जमीन सपाटीकरण लवकर होऊ लागले. उंचसखल भाग सपाट झाल्याने बागायती शेतीचे प्रमाण वाढले. जे मजूर दुसऱ्याकडे शेतकामाला जात होते ते स्वत: शेती करू लागल्याने मजुरांची कमतरता भासू लागली आहे. तसेच बाजारात विविध कंपन्यांचे तणनाशक उपलब्ध झाल्याने कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. पूर्वी शेतीमध्ये गहू, हरभरा ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात असत. अगदी मोजके शेतकरी उन्हाळ कांद्याची लागवड करीत असत. त्यामुळे सहज मजूर उपलब्ध होत. परंतु आठ-दहा वर्षांपासून कांदा या पिकाकडे हमखास पैसा देणारे पीक म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळाला आहे. चार-पाच वर्षांपूवी कोकणातील आदिवासींकडे कामे नव्हती. त्यामुळे ते दिवाळीनंतर कामासाठी शहरात येत असत. परंतु तेही बागायती शेती करू लागल्याने त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे तेही अगदी मोजक्या प्रमाणात शहरात येतात. तेथील खासगी वाहनधारक लवकर सकाळी मजूर ज्या शेतकऱ्याने सांगितले त्याच्याकडे मजूर नेऊन सोडतात. काही वाहनधारक त्याच मजुरांमध्ये कामाला लागतात. (वार्ताहर)